शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

पातूर एमआयडीसी केवळ नावालाच; २५ वर्षांपासून उद्योगच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:16 IST

२५ वर्षांपासून भूखंड नावाने करून ठेवले. मात्र उद्योगच काय तर साधा फुटाणे निर्मितीचाही कारखाना सुरू होऊ शकला नाही. ...

२५ वर्षांपासून भूखंड नावाने करून ठेवले. मात्र उद्योगच काय तर साधा फुटाणे निर्मितीचाही कारखाना सुरू होऊ शकला नाही. पातूर-बाळापूर महामार्गालगत देऊळगाव शिवजवळ महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणाचे मोठा फलक लावला आहे. तीस एकरांची विस्तीर्ण जागेत कुठलाही उद्योग गत २५ वर्षांपासून सुरू झाला नसल्याचे वास्तव आहे. शहरासह तालुक्यातील बेरोजगार युवकांची संख्या वाढत असून, उच्चशिक्षण घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी मिळत नाही. याठिकाणी उद्योगांची निर्मिती झाली तर रोजगार उपलब्ध होईल. यासाठी आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. प्रशासनाकडून रोजगार मेळावे व मार्गदर्शनाची कमतरतेमुळे बेरोजगार युवकांची तालुक्यात फौजच निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक युवक परप्रांतात रोजगारासाठी गेले आहेत. शासनाकडून पातूर-बाळापूर महामार्गालगत तीस एकरावर एमआयडीसी उभी राहिली. याठिकाणी मोठे उद्योग, कारखाने येणार, बेरोजगारांना रोेजगार मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु गत २५ वर्षांमध्ये एकही उद्योग याठिकाणी सुरू झाला नाही. व्यावसायिकांनी केवळ भूखंड घेऊन ठेवले. शहरातील व शहराबाहेरील व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी एमआयडीसीत उद्योग करण्याच्या उद्देशाने भूखंड खरेदी करून ठेवले होते. मात्र याठिकाणी एकही उद्योग सुरू होऊ शकला नाही. मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट कोसळल्यामुळे परप्रांतात जाणाऱ्या युवकांची फरपट झाली. परप्रांतात गेलेले युवक, व्यावसायिक आपापल्या गावी परतले होते. मात्र त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. या वर्षीसुद्धा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे.

फोटो:

रोजगार, उद्योगासाठी पुढाकार घेण्याची गरज

कोणतेही काम आणि उद्योग करण्याची बेरोजगार युवकांमध्ये जिद्द आहे. मात्र प्रशासनाकडून युवकांना मार्गदर्शन, उद्योगांसाठी कर्ज मिळत नाही. एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणमध्ये बेरोजगार युवकांसाठी लघुउद्योग आणि कुटीर उद्योग निर्मितीसाठी मार्गदर्शक मेळावे आणि शिबिर घेण्याची गरज आहे. मिनी एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू झाल्यास तालुक्यातील युवकांचे स्थलांतर थांबेल.