शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुलांसाठी पालकांची धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 01:52 IST

सेतु केंद्रे गजबजली; कागदपत्रांची जुळवाजुळव पालकांसाठी ठरतेय डोकेदुखी.

अकोला: दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांंनी पुढील शिक्षणासाठी कंबर कसली आहे. अकरावीतील प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. सर्व कागदपत्रे सेतु केंद्रावरून ऑनलाइन काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु हीच सेवा डोकेदुखी ठरत आहे. दहावी व बारावीनंतर पालक आपला मुलगा किंवा मुलीला एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खटाटोप करतात. त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावी, हे प्रत्येक पालकाचे ध्येय असते. ते पूर्ण करण्यासाठी पालक हिरिरीने प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने मुलांना पुढील शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, या हेतूने ते प्रयत्नरत असतात. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला, अधिवास, नॉन क्रिमी लेअर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राची जुळवाजुळव केली जाते. याशिवाय बर्‍याच कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते; मात्र येथील तहसील कार्यालयांतर्गत येणार्‍या शासकीय व खासगी सेतु केंद्राच्या डोकेदुखीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांंना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात लिंक वारंवार खंडित होत असल्यामुळे तासन्तास वाट पाहावी लागते. त्यामुळे पालक व विद्यार्थी हैराण झाले आहेत. अशातच सेतु केंद्रावरील वाढती गर्दी पाहून सेतु केंद्रचालकांनी नको असलेले प्रमाणपत्र देऊन व वाजवीपेक्षा जादा पैसे उकळत असल्याचे आरोप होत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कागदपत्रे मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.