शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

१५ हजार वराह होणार हद्दपार!

By admin | Updated: November 27, 2015 01:52 IST

१५ दिवसांत शहराबाहेर काढण्याचे आयुक्तांचे निर्देश

अकोला : शहरात वराहांची संख्या मोठी आहे. रस्त्याच्या मधून जाणार्‍या वराहांमुळे अपघाताची शक्यता तर राहतेच, पण त्यापेक्षा स्वाइन फ्लूसारख्या आजारांची शक्यताही वाढली आहे. याबाबत महापौर आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर शहरातील १५ हजारांवर वराह शहराबाहेर काढण्याचे नियोजन महापालिका प्रशासन करीत आहे. अकोला शहरात २00 कुटुंबांकडून वराहपालनाचा व्यवसाय केला जातो. या वराहांच्या झुंडी शहरात सर्वत्र फिरताना दिसतात. ते रस्त्याच्या मधून जात असताना वाहनांचा अपघात झाल्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. वराहांच्या झुंडीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वराहपालनाचा व्यवसाय शहराबाहेर करण्याचा आदेश आयुक्तांनी गुरुवारी वराह पालक-मालकांना दिला. त्यांनी यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर प्रशासनातर्फे सक्तीने वराह शहराबाहेर काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.