शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

५३५ पैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ...

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींच्या स्तरावर सद्य:स्थितीत एक हजार ३२४ कामे सुरू असून, त्यावर काम करीत असलेल्या पाच हजार १२७ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत विविध कामे करण्यात येतात. त्यामध्ये फळबाग लागवड, वृक्षलागवड, रोपवाटिका, वृक्ष संगोपन, घरकूल, गुरांचे गोठे, शाैचखड्डे, सिंचन विहिरी, तुती लागवड आदी प्रकारची कामे करण्यात येतात. रोहयो अंतर्गत जाॅबकार्डधारक मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५३५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी केवळ २८७ ग्रामपंचायतींतर्गत सद्य:स्थितीत रोजगार हमी योजनेची एक हजार ३२४ कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या कामांवर पाच हजार १२७ मजुरांची उपस्थिती आहे. संबंधित ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींमध्ये सुरू

असलेली कामे व मजूर उपस्थितीची स्थिती!

तालुका ग्रामपंचायत कामे मजूर

अकोला ५७ २६० १०३३

अकोट ५३ ३२३ ११०२

बाळापूर ३५ १८६ ७३७

बार्शिटाकळी ४० १४५ ६०२

मूर्तिजापूर ४० १७३ ७२८

पातूर ३९ १६९ ६६४

तेल्हारा २३ ६८ २६१

...................................................................................................

एकूण २८७ १३२४ ५१२७

सर्वात कमी रोजगार तेल्हारा तालुक्यात!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू असून, या कामांवर पाच हजार १२७ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सर्वाधिक ३२३ कामे सुरू असून, या कामांवर एक हजार १०२ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तेल्हारा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६८ कामे सुरू असून, त्यावर केवळ २६१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे रोहयोंतर्गत जिल्ह्यात सर्वात कमी तेल्हारा तालुक्यात मजुरांना रोजगार मिळाल्याचे चित्र आहे.