शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

केवळ ५५ गावांनाच मिळणार दुष्काळी मदत

By admin | Updated: December 30, 2015 02:13 IST

अकोला जिल्ह्यातील ९४२ दुष्काळग्रस्त गावं मदतीपासून वंचित.

अकोला: राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनामार्फत ३१00 कोटी रुपयांची मदत मंगळवारी जाहीर करण्यात आली असली तरी त्यामध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांनाच या दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सुधारित पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांचे काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनामार्फत ३१00 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यावर्षीच्या खरीप हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सवलती लागू करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २0 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीमध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या केवळ ५५ गावांचा समावेश आहे. त्यानंतर गत ७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमधील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे; परंतु शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीमध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांचाच समावेश आहे. सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असली तरी शासनामार्फत ही गावे अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे केंद्र शासनामार्फत राज्यातील दुष्काळ निवारणासाठी ३१00 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी या मदतीचा लाभ जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांना शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.