शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केवळ २६ दिवस पडला पाऊस

By admin | Updated: October 8, 2015 01:43 IST

अकोला जिल्ह्यात चार महिन्यात ६५५.९0 मि.मी.पाऊस

अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ २६ दिवसांमध्ये पाऊस पडला असून, जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरी ६५५.९0 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत सरासरी ६९७.0३ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात गेल्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत ६५५.९0 मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळय़ात झालेला पाऊस हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६ टक्के कमी आहे. एकूण सरासरी ९४.0६ टक्के पाऊस ३0 सप्टेंबरपर्यंत झाला. त्यामुळे परतीच्या पावसावर शेतकर्‍यांच्या आशा टिकून होत्या. यंदा जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांच्या १२२ दिवसांच्या कालावधीत केवळ २६ दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाने खंड दिल्याने आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, यावर्षी जिल्ह्यात मुगाचे पीक हातून गेले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही घट झाली. कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याने, या पिकाचे उत्पादनही घटणार असल्याची स्थिती आहे. पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे.