शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

केवळ २६ दिवस पडला पाऊस

By admin | Updated: October 8, 2015 01:43 IST

अकोला जिल्ह्यात चार महिन्यात ६५५.९0 मि.मी.पाऊस

अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ २६ दिवसांमध्ये पाऊस पडला असून, जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरी ६५५.९0 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत सरासरी ६९७.0३ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात गेल्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत ६५५.९0 मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळय़ात झालेला पाऊस हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६ टक्के कमी आहे. एकूण सरासरी ९४.0६ टक्के पाऊस ३0 सप्टेंबरपर्यंत झाला. त्यामुळे परतीच्या पावसावर शेतकर्‍यांच्या आशा टिकून होत्या. यंदा जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांच्या १२२ दिवसांच्या कालावधीत केवळ २६ दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाने खंड दिल्याने आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, यावर्षी जिल्ह्यात मुगाचे पीक हातून गेले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही घट झाली. कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याने, या पिकाचे उत्पादनही घटणार असल्याची स्थिती आहे. पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे.