शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुका प्रभारी अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत ...

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, कामाचा वेग मंदावला आहे. ठोस निर्णय न घेता केवळ दैनंदिन कामकाज करून अधिकारी मोकळे होत असल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील विविध विभागांतील अनेक पदे रिक्त असून, कार्यालयीन प्रमुखपदेसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदारपदसुद्धा रिक्त असून नायब तहसीलदार यांच्याकडे पदभार आहे. ग्रामीण भागाचा विकास तसेच विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम तालुका स्तरावरील पंचायत समितीचे असून या कार्यालयातील तर अनेक पदे रिक्त असून गटविकास अधिकारी यासारखे मुख्य पद गतवर्षापासून रिक्त आहे, तर या पदाचा प्रभारही कृषी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. शहराच्या विकासाकरिता व जनतेच्या आरोग्यविषयक तसेच विविध योजनांचा लाभ देण्याकरिता नगरपरिषद आहे. मात्र येथीलसुद्धा अनेक पदे रिक्त आहेत. मुख्य पद असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असून, त्यांचा प्रभार बाळापूर न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हिवरखेड येथील ठाणेदारांची बदली झाली असून, अकोट येथील अधिकाऱ्याकडे प्रभार आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्य उपअधीक्षक पदसुद्धा रिक्त असून त्या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास अधिकारी हे पद रिक्त असून, या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्यांकडे दिला असून, या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे.

...............................

अधिकाऱ्यांना तेल्हारा तालुक्याची ॲलर्जी

तेल्हारा हे ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणाहून लांब अंतरावर असून, रात्री-बेरात्री दळणवळणाची साधने उपलब्ध हाेत नाहीत. रस्त्याची समस्यासुद्धा बिकट आहे. येथील स्थानिक राजकारणाचासुद्धा अनेक अधिकारी धसका घेत असल्याने तेल्हाऱ्याला पसंती देण्यास कोणीही अधिकारी धजावत नसल्याची चर्चा अधिकारी वर्गात हाेताना दिसून येत आहे.

......................................

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

पालकमंत्री बच्चू कडू यांचे या तालुक्यावर विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथील नागरिक त्यांच्याकडे कुठलीही समस्या हक्काने घेऊन जातात, परंतु या समस्येकडे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढावा, जेणेकरून तालुक्याच्या कामाला गती मिळेल, अशी मागणी जाेर धरत आहे.