शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

तेल्हारा तालुका प्रभारी अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत ...

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, कामाचा वेग मंदावला आहे. ठोस निर्णय न घेता केवळ दैनंदिन कामकाज करून अधिकारी मोकळे होत असल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील विविध विभागांतील अनेक पदे रिक्त असून, कार्यालयीन प्रमुखपदेसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदारपदसुद्धा रिक्त असून नायब तहसीलदार यांच्याकडे पदभार आहे. ग्रामीण भागाचा विकास तसेच विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम तालुका स्तरावरील पंचायत समितीचे असून या कार्यालयातील तर अनेक पदे रिक्त असून गटविकास अधिकारी यासारखे मुख्य पद गतवर्षापासून रिक्त आहे, तर या पदाचा प्रभारही कृषी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. शहराच्या विकासाकरिता व जनतेच्या आरोग्यविषयक तसेच विविध योजनांचा लाभ देण्याकरिता नगरपरिषद आहे. मात्र येथीलसुद्धा अनेक पदे रिक्त आहेत. मुख्य पद असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असून, त्यांचा प्रभार बाळापूर न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हिवरखेड येथील ठाणेदारांची बदली झाली असून, अकोट येथील अधिकाऱ्याकडे प्रभार आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्य उपअधीक्षक पदसुद्धा रिक्त असून त्या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास अधिकारी हे पद रिक्त असून, या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्यांकडे दिला असून, या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे.

...............................

अधिकाऱ्यांना तेल्हारा तालुक्याची ॲलर्जी

तेल्हारा हे ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणाहून लांब अंतरावर असून, रात्री-बेरात्री दळणवळणाची साधने उपलब्ध हाेत नाहीत. रस्त्याची समस्यासुद्धा बिकट आहे. येथील स्थानिक राजकारणाचासुद्धा अनेक अधिकारी धसका घेत असल्याने तेल्हाऱ्याला पसंती देण्यास कोणीही अधिकारी धजावत नसल्याची चर्चा अधिकारी वर्गात हाेताना दिसून येत आहे.

......................................

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

पालकमंत्री बच्चू कडू यांचे या तालुक्यावर विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथील नागरिक त्यांच्याकडे कुठलीही समस्या हक्काने घेऊन जातात, परंतु या समस्येकडे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढावा, जेणेकरून तालुक्याच्या कामाला गती मिळेल, अशी मागणी जाेर धरत आहे.