शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुका प्रभारी अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत ...

तेल्हारा : तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यासारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, कामाचा वेग मंदावला आहे. ठोस निर्णय न घेता केवळ दैनंदिन कामकाज करून अधिकारी मोकळे होत असल्याने अनेक कामांना ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील विविध विभागांतील अनेक पदे रिक्त असून, कार्यालयीन प्रमुखपदेसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदारपदसुद्धा रिक्त असून नायब तहसीलदार यांच्याकडे पदभार आहे. ग्रामीण भागाचा विकास तसेच विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम तालुका स्तरावरील पंचायत समितीचे असून या कार्यालयातील तर अनेक पदे रिक्त असून गटविकास अधिकारी यासारखे मुख्य पद गतवर्षापासून रिक्त आहे, तर या पदाचा प्रभारही कृषी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. शहराच्या विकासाकरिता व जनतेच्या आरोग्यविषयक तसेच विविध योजनांचा लाभ देण्याकरिता नगरपरिषद आहे. मात्र येथीलसुद्धा अनेक पदे रिक्त आहेत. मुख्य पद असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली असून, त्यांचा प्रभार बाळापूर न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हिवरखेड येथील ठाणेदारांची बदली झाली असून, अकोट येथील अधिकाऱ्याकडे प्रभार आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्य उपअधीक्षक पदसुद्धा रिक्त असून त्या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास अधिकारी हे पद रिक्त असून, या पदाचा प्रभार अकोट येथील अधिकाऱ्यांकडे दिला असून, या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे.

...............................

अधिकाऱ्यांना तेल्हारा तालुक्याची ॲलर्जी

तेल्हारा हे ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणाहून लांब अंतरावर असून, रात्री-बेरात्री दळणवळणाची साधने उपलब्ध हाेत नाहीत. रस्त्याची समस्यासुद्धा बिकट आहे. येथील स्थानिक राजकारणाचासुद्धा अनेक अधिकारी धसका घेत असल्याने तेल्हाऱ्याला पसंती देण्यास कोणीही अधिकारी धजावत नसल्याची चर्चा अधिकारी वर्गात हाेताना दिसून येत आहे.

......................................

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

पालकमंत्री बच्चू कडू यांचे या तालुक्यावर विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथील नागरिक त्यांच्याकडे कुठलीही समस्या हक्काने घेऊन जातात, परंतु या समस्येकडे पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढावा, जेणेकरून तालुक्याच्या कामाला गती मिळेल, अशी मागणी जाेर धरत आहे.