शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते ...

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते शहरातील सिंधी कॅम्प चौकात गर्दी करीत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बसस्थानकात कोरोना टेस्ट

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील बसस्थानकात वाढती गर्दी पाहता येथे प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

अकोट, अकोला तालुक्यात कमी पाऊस

अकोला : जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोट तालुक्यात ३१.० मिमी तर अकोला तालुक्यात ५६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्यात सर्वाधिक कमी नोंद आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप

अकोला : शहरात रविवारी रात्री दीड तास दमदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात उकाडा जाणवत होता.

पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी

अकोला : ग्रामीण भागातील नागरिक घरांवर ताडपत्री तसेच प्लॅस्टिक टाकण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे सध्या या दुकानांमध्ये गर्दी होत असून, काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर लावत आहे.

सोशल डिस्टन्स केवळ नावालाच

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे; मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी केली जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अकोला : मागील काही दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दवाखान्यातही रुग्णसंख्येत वाढ झाली.

अग्रसेन चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अकोला : येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील अग्रसेन चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे चिखल साचला आहे.

वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला

अकोला : कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच आता वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला-ताप यासारखी काही नागरिकांना लक्षणे दिसून लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

८० ते १०० मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा!

अकोला : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पेरणी केलेले बियाणे उगवण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक असते, त्यासाठी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय म्हणजे जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.