शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते ...

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते शहरातील सिंधी कॅम्प चौकात गर्दी करीत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बसस्थानकात कोरोना टेस्ट

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील बसस्थानकात वाढती गर्दी पाहता येथे प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

अकोट, अकोला तालुक्यात कमी पाऊस

अकोला : जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोट तालुक्यात ३१.० मिमी तर अकोला तालुक्यात ५६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्यात सर्वाधिक कमी नोंद आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप

अकोला : शहरात रविवारी रात्री दीड तास दमदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात उकाडा जाणवत होता.

पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी

अकोला : ग्रामीण भागातील नागरिक घरांवर ताडपत्री तसेच प्लॅस्टिक टाकण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे सध्या या दुकानांमध्ये गर्दी होत असून, काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर लावत आहे.

सोशल डिस्टन्स केवळ नावालाच

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे; मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी केली जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अकोला : मागील काही दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दवाखान्यातही रुग्णसंख्येत वाढ झाली.

अग्रसेन चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अकोला : येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील अग्रसेन चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे चिखल साचला आहे.

वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला

अकोला : कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच आता वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला-ताप यासारखी काही नागरिकांना लक्षणे दिसून लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

८० ते १०० मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा!

अकोला : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पेरणी केलेले बियाणे उगवण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक असते, त्यासाठी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय म्हणजे जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.