शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रुग्णसंख्या घसरली; अकोलेकरांनो गाफील राहू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

अकाेला : मागील आठ दिवसांच्या कालावधीत शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ गुरुवारी जिल्हा ...

अकाेला : मागील आठ दिवसांच्या कालावधीत शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे़ गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील १६२ जणांना काेराेनाची लागण झाली आहे़ काेराेना बाधितांचा घसरलेला आकडा पाहता अकाेलेकरांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी गाफील राहू नये, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाने हाहाकार घातला आहे़ मनपा क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासनाचे प्रयत्न तोकडे ठरले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते प्रभावी उपाययाेजना राबविण्यात प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरली आहे. दुसरीकडे नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळेच मागील अडीच महिन्यांपासून शहरात दरराेज किमान अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक जणांना काेराेनाची बाधा हाेत असल्याचे अहवालाअंती दिसून येत होते. यामध्ये ज्यांनी काेराेनाची चाचणी केलीच नाही, अशा बाधितांची मनपाच्या दप्तरी नाेंदच नाही़ त्यामुळे काेराेनाबाधितांचा वाढता आकडा पाहता शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाल्याची परिस्थिती आहे़ अशा परिस्थितीत गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालात प्रथमच काेराेनाबाधितांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसून आले़

पश्चिम झाेनमध्ये संख्या वाढली!

शहरात दरराेज अडीचशे किंवा तीनशे रुग्ण आढळून येत असतील तर त्यामध्ये प्रत्येकी शंभर रुग्ण हे पूर्व व दक्षिण झाेनमधील असल्याचे चित्र होते. मागील काही दिवसांपासून या दोन्ही झोनमधील संख्या कमी झाली असली तरी आता पाचिम झोनमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात पूर्व झाेनमध्ये ४५ रुग्ण आढळून आले़ तसेच पश्चिम झाेनमध्ये ४४ , उत्तर झाेनमध्ये १७ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ५६ रुग्ण आढळून आले आहेत़