शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

देशात रक्तदात्यांची संख्या १ टक्क्यापेक्षाही कमी

By admin | Updated: September 30, 2015 23:49 IST

२५ लाख युनीट रक्तसाठा कमी , आज ऐच्छिक रक्तदान दिन.

विवेक चांदूरकर/वाशिम - देशभरात रक्तदानाबाबत जनजागृती करून विशेष मोहीम राबविण्यात येत असली तरी रक्तदात्यांमध्ये मात्र उदासिनताच दिसत आहे. १२८ कोटी लोकसंख्येच्या या देशात वर्षाकाठी केवळ १ कोटी युनीट रक्त संकलीत होत असून, हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. देशात दरवर्षी १.२५ कोटी युनीट रक्ताची गरज भासत असून, २५ लाख रूग्णांना मात्र वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागतात. सरकार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांपासून ट्रकच्या फलकांपर्यंत विविध म्हणी व सुविचारांव्दारे रक्तदानाबाबत जागृती करण्यात येते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांमार्फतही रक्तदान शिबीरं घेतली जातात. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी १ ऑक्टोबर हा दिन ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. तरीही प्रत्यक्षात रक्तदान करणार्‍यांची संख्या अत्यल्पच आहे. देशाची लोकसंख्या १२८ कोटींपेक्षा जास्त आहे. रक्तदात्यांची संख्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक टक्काही नाही. देशभरात २0१४- १५ वर्षांमध्ये ६0 हजार रक्तदान शिबीरांतर्गत १ कोटी युनीट रक्त संकलन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार देशात दरवर्षी रक्तदानाची गरज १.२५ कोटी युनीट एवढी आहे. म्हणजेच दरवर्षी २५ लक्ष युनीट रक्त कमी पडल्याने लाखो रूग्णांना जीव गमवावा लागतो.

महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद देशात अव्वल

राज्यात ३१५ रक्तपेढय़ांतर्गत रक्तसंकलन व रक्तदानाचे काम करण्यात येते. त्यापैकी केवळ ६९ रक्तपेढय़ा शासकीय आहेत. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये गर्भवती माता तसेच दारिद्य्र रेषेखालील रूग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. २0१४ - १५ मध्ये १५ लक्ष ६५ हजार युनीट रक्त संकलन करण्यात आले. यापैकी ३ लक्ष युनीट रक्त हे शासकीय रक्तपेढय़ांव्दारे करण्यात आले.

महिला मागेच

देशाच्या लोकसंख्येत ५0 टक्के महिला आहेत; मात्र महिलांचे रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता, वजन कमी असणे यामुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत. यासोबतच रूढी, परंपरा व सामाजिक रचनेमुळे महिला रक्तदान करण्यास धजावत नाहीत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त साठवणूक केंद्र

आता राज्य रक्तसंक्रमण परिषदेमार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रक्त साठवणूक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे गाव पातळीपर्यंत रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास रक्तपुरवठा करता येईल.