शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

देशात रक्तदात्यांची संख्या १ टक्क्यापेक्षाही कमी

By admin | Updated: September 30, 2015 23:49 IST

२५ लाख युनीट रक्तसाठा कमी , आज ऐच्छिक रक्तदान दिन.

विवेक चांदूरकर/वाशिम - देशभरात रक्तदानाबाबत जनजागृती करून विशेष मोहीम राबविण्यात येत असली तरी रक्तदात्यांमध्ये मात्र उदासिनताच दिसत आहे. १२८ कोटी लोकसंख्येच्या या देशात वर्षाकाठी केवळ १ कोटी युनीट रक्त संकलीत होत असून, हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. देशात दरवर्षी १.२५ कोटी युनीट रक्ताची गरज भासत असून, २५ लाख रूग्णांना मात्र वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागतात. सरकार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांपासून ट्रकच्या फलकांपर्यंत विविध म्हणी व सुविचारांव्दारे रक्तदानाबाबत जागृती करण्यात येते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांमार्फतही रक्तदान शिबीरं घेतली जातात. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी १ ऑक्टोबर हा दिन ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. तरीही प्रत्यक्षात रक्तदान करणार्‍यांची संख्या अत्यल्पच आहे. देशाची लोकसंख्या १२८ कोटींपेक्षा जास्त आहे. रक्तदात्यांची संख्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक टक्काही नाही. देशभरात २0१४- १५ वर्षांमध्ये ६0 हजार रक्तदान शिबीरांतर्गत १ कोटी युनीट रक्त संकलन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार देशात दरवर्षी रक्तदानाची गरज १.२५ कोटी युनीट एवढी आहे. म्हणजेच दरवर्षी २५ लक्ष युनीट रक्त कमी पडल्याने लाखो रूग्णांना जीव गमवावा लागतो.

महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद देशात अव्वल

राज्यात ३१५ रक्तपेढय़ांतर्गत रक्तसंकलन व रक्तदानाचे काम करण्यात येते. त्यापैकी केवळ ६९ रक्तपेढय़ा शासकीय आहेत. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये गर्भवती माता तसेच दारिद्य्र रेषेखालील रूग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. २0१४ - १५ मध्ये १५ लक्ष ६५ हजार युनीट रक्त संकलन करण्यात आले. यापैकी ३ लक्ष युनीट रक्त हे शासकीय रक्तपेढय़ांव्दारे करण्यात आले.

महिला मागेच

देशाच्या लोकसंख्येत ५0 टक्के महिला आहेत; मात्र महिलांचे रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता, वजन कमी असणे यामुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत. यासोबतच रूढी, परंपरा व सामाजिक रचनेमुळे महिला रक्तदान करण्यास धजावत नाहीत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त साठवणूक केंद्र

आता राज्य रक्तसंक्रमण परिषदेमार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रक्त साठवणूक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे गाव पातळीपर्यंत रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास रक्तपुरवठा करता येईल.