शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देशात रक्तदात्यांची संख्या १ टक्क्यापेक्षाही कमी

By admin | Updated: September 30, 2015 23:49 IST

२५ लाख युनीट रक्तसाठा कमी , आज ऐच्छिक रक्तदान दिन.

विवेक चांदूरकर/वाशिम - देशभरात रक्तदानाबाबत जनजागृती करून विशेष मोहीम राबविण्यात येत असली तरी रक्तदात्यांमध्ये मात्र उदासिनताच दिसत आहे. १२८ कोटी लोकसंख्येच्या या देशात वर्षाकाठी केवळ १ कोटी युनीट रक्त संकलीत होत असून, हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. देशात दरवर्षी १.२५ कोटी युनीट रक्ताची गरज भासत असून, २५ लाख रूग्णांना मात्र वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागतात. सरकार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांपासून ट्रकच्या फलकांपर्यंत विविध म्हणी व सुविचारांव्दारे रक्तदानाबाबत जागृती करण्यात येते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थांमार्फतही रक्तदान शिबीरं घेतली जातात. रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी १ ऑक्टोबर हा दिन ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. तरीही प्रत्यक्षात रक्तदान करणार्‍यांची संख्या अत्यल्पच आहे. देशाची लोकसंख्या १२८ कोटींपेक्षा जास्त आहे. रक्तदात्यांची संख्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक टक्काही नाही. देशभरात २0१४- १५ वर्षांमध्ये ६0 हजार रक्तदान शिबीरांतर्गत १ कोटी युनीट रक्त संकलन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार देशात दरवर्षी रक्तदानाची गरज १.२५ कोटी युनीट एवढी आहे. म्हणजेच दरवर्षी २५ लक्ष युनीट रक्त कमी पडल्याने लाखो रूग्णांना जीव गमवावा लागतो.

महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद देशात अव्वल

राज्यात ३१५ रक्तपेढय़ांतर्गत रक्तसंकलन व रक्तदानाचे काम करण्यात येते. त्यापैकी केवळ ६९ रक्तपेढय़ा शासकीय आहेत. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये गर्भवती माता तसेच दारिद्य्र रेषेखालील रूग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. २0१४ - १५ मध्ये १५ लक्ष ६५ हजार युनीट रक्त संकलन करण्यात आले. यापैकी ३ लक्ष युनीट रक्त हे शासकीय रक्तपेढय़ांव्दारे करण्यात आले.

महिला मागेच

देशाच्या लोकसंख्येत ५0 टक्के महिला आहेत; मात्र महिलांचे रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. रक्तामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता, वजन कमी असणे यामुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत. यासोबतच रूढी, परंपरा व सामाजिक रचनेमुळे महिला रक्तदान करण्यास धजावत नाहीत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त साठवणूक केंद्र

आता राज्य रक्तसंक्रमण परिषदेमार्फत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रक्त साठवणूक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे गाव पातळीपर्यंत रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास रक्तपुरवठा करता येईल.