शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आता शेतकरीच करतील बीजोत्पादन!

By admin | Updated: November 16, 2014 01:09 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे धडे.

अकोला: शेतकर्‍यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळावे, याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत विदर्भातील शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञानाची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे. बोगस बियाण्यांना आळा बसावा, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. अलीकडे देशात बियाणे टंचाई आणि बोगस बियाण्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकर्‍यांना प्रत्येक हंगामात सोसावा लागतो. यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड बियाणे टंचाई निर्माण झाली होती. प्रमाणित सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने विदर्भातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे वांझ निघाले, या वांझ बियाण्याची नुकसान भरपाई शेकडो शेतकर्‍यांना अद्या पही मिळाली नाही. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. मुख्यत्वे विदर्भातील शेतकर्‍यांच्या माथी बोगस, वांझ बियाणे मारले जात असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांनी उच्च प्रतिचे बियाणे निर्माण करावे, यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत शंभरच्यावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, येत्या हंगामात या शेतकर्‍यांकडून उच्च प्रतिचे बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे अनेक वाण विकसित केले आहेत. यात काबुली काक-२, तूर आशा, गहू, उडीद, गुलाबी, करडी अशा शेकडो वाणांचा समावेश आहे; तथापि जोपर्यंत हे वाण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंंत त्या वाणांचे तंत्रज्ञान आणि उपयोगिता निश्‍चित होऊ शकणार नाही. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाचे बियाणे वापरावे आणि या बियाण्यांचे बीजोत्पादन करण्यावर भर देण्यात येत आहे. बीजोत्पादन तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज असून, बीजोत्पादन कर ताना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सोडविल्या जात आहेत. शेतकर्‍यांनी याबाबतच्या तांत्रिक बाबी समजून घेण्याची गरज असल्याचे कृषीविद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ.डी.टी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.