शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

आता शेतकरीच करतील बीजोत्पादन!

By admin | Updated: November 16, 2014 01:09 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे धडे.

अकोला: शेतकर्‍यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाकडे वळावे, याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत विदर्भातील शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञानाची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे. बोगस बियाण्यांना आळा बसावा, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. अलीकडे देशात बियाणे टंचाई आणि बोगस बियाण्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकर्‍यांना प्रत्येक हंगामात सोसावा लागतो. यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड बियाणे टंचाई निर्माण झाली होती. प्रमाणित सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने विदर्भातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे वांझ निघाले, या वांझ बियाण्याची नुकसान भरपाई शेकडो शेतकर्‍यांना अद्या पही मिळाली नाही. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या आधुनिक बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्शनाचे महत्त्व वाढले आहे. मुख्यत्वे विदर्भातील शेतकर्‍यांच्या माथी बोगस, वांझ बियाणे मारले जात असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांनी उच्च प्रतिचे बियाणे निर्माण करावे, यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत शंभरच्यावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, येत्या हंगामात या शेतकर्‍यांकडून उच्च प्रतिचे बियाणे निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे अनेक वाण विकसित केले आहेत. यात काबुली काक-२, तूर आशा, गहू, उडीद, गुलाबी, करडी अशा शेकडो वाणांचा समावेश आहे; तथापि जोपर्यंत हे वाण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंंत त्या वाणांचे तंत्रज्ञान आणि उपयोगिता निश्‍चित होऊ शकणार नाही. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाचे बियाणे वापरावे आणि या बियाण्यांचे बीजोत्पादन करण्यावर भर देण्यात येत आहे. बीजोत्पादन तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज असून, बीजोत्पादन कर ताना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सोडविल्या जात आहेत. शेतकर्‍यांनी याबाबतच्या तांत्रिक बाबी समजून घेण्याची गरज असल्याचे कृषीविद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ.डी.टी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.