शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी आता कंत्राटदाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ...

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन त्यावर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया हाेणे अपेक्षित आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील बाजारपेठ,व्यावसायिक प्रतिष्ठाने व घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी केली हाेती. आजराेजी यापैकी १२१ वाहनांद्वारे कचरा संकलन केला जाताे. त्यावर नियुक्त केलेल्या वाहनचालकांना मनपाकडून दरराेज पाच ते सहा लिटर इंधन दिले जाते. व्यावसायिक प्रतिष्ठानला प्रति महिना २०० रुपये व

नागरिकांजवळून वसूल केल्या जाणारे प्रति महिना ३० रुपये शुल्क मानधनपाेटी वाहन चालकांकडे जमा हाेते. यामध्ये वाहनचालकांकडे वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश हाेता. यादरम्यान, काही वाहन चालक केवळ व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी काम करीत असल्याची बाब समाेर आली हाेती. तसेच काही बहाद्दर इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी कचरा नायगावस्थित डंम्पिंग ग्राउंडवर न टाकता शहरातील खुली मैदाने, राष्ट्रीय महामार्गालगत जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून पळ काढत हाेते. यामुळे कचऱ्याची समस्या वाढीस लागली हाेती.

चालकांच्या दुकानदारीला ‘ब्रेक’

शहरातील माेठे हाॅटेल, वाइन बार, खानावळी, मंगल कार्यालये तसेच रेस्टाॅरन्टमधून निघणारे उष्टे व शिळे अन्न संकलित करून त्याची वराह व्यावसायिकांना विक्री करण्याचा उद्याेग काही बहाद्दर वाहन चालकांनी सुरू केला हाेता. याबदल्यात संबंधित प्रतिष्ठानच्या संचालकांकडूनही अतिरिक्त पैसे दिले जात हाेते. त्यासाठी रात्री,बेरात्री घंटागाडीचा वापर केला जात हाेता.