शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी आता कंत्राटदाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ...

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन त्यावर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया हाेणे अपेक्षित आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील बाजारपेठ,व्यावसायिक प्रतिष्ठाने व घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी केली हाेती. आजराेजी यापैकी १२१ वाहनांद्वारे कचरा संकलन केला जाताे. त्यावर नियुक्त केलेल्या वाहनचालकांना मनपाकडून दरराेज पाच ते सहा लिटर इंधन दिले जाते. व्यावसायिक प्रतिष्ठानला प्रति महिना २०० रुपये व

नागरिकांजवळून वसूल केल्या जाणारे प्रति महिना ३० रुपये शुल्क मानधनपाेटी वाहन चालकांकडे जमा हाेते. यामध्ये वाहनचालकांकडे वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश हाेता. यादरम्यान, काही वाहन चालक केवळ व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी काम करीत असल्याची बाब समाेर आली हाेती. तसेच काही बहाद्दर इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी कचरा नायगावस्थित डंम्पिंग ग्राउंडवर न टाकता शहरातील खुली मैदाने, राष्ट्रीय महामार्गालगत जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून पळ काढत हाेते. यामुळे कचऱ्याची समस्या वाढीस लागली हाेती.

चालकांच्या दुकानदारीला ‘ब्रेक’

शहरातील माेठे हाॅटेल, वाइन बार, खानावळी, मंगल कार्यालये तसेच रेस्टाॅरन्टमधून निघणारे उष्टे व शिळे अन्न संकलित करून त्याची वराह व्यावसायिकांना विक्री करण्याचा उद्याेग काही बहाद्दर वाहन चालकांनी सुरू केला हाेता. याबदल्यात संबंधित प्रतिष्ठानच्या संचालकांकडूनही अतिरिक्त पैसे दिले जात हाेते. त्यासाठी रात्री,बेरात्री घंटागाडीचा वापर केला जात हाेता.