शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी आता कंत्राटदाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ...

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाताे. यामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन त्यावर डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया हाेणे अपेक्षित आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील बाजारपेठ,व्यावसायिक प्रतिष्ठाने व घराेघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी केली हाेती. आजराेजी यापैकी १२१ वाहनांद्वारे कचरा संकलन केला जाताे. त्यावर नियुक्त केलेल्या वाहनचालकांना मनपाकडून दरराेज पाच ते सहा लिटर इंधन दिले जाते. व्यावसायिक प्रतिष्ठानला प्रति महिना २०० रुपये व

नागरिकांजवळून वसूल केल्या जाणारे प्रति महिना ३० रुपये शुल्क मानधनपाेटी वाहन चालकांकडे जमा हाेते. यामध्ये वाहनचालकांकडे वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश हाेता. यादरम्यान, काही वाहन चालक केवळ व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी काम करीत असल्याची बाब समाेर आली हाेती. तसेच काही बहाद्दर इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी कचरा नायगावस्थित डंम्पिंग ग्राउंडवर न टाकता शहरातील खुली मैदाने, राष्ट्रीय महामार्गालगत जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून पळ काढत हाेते. यामुळे कचऱ्याची समस्या वाढीस लागली हाेती.

चालकांच्या दुकानदारीला ‘ब्रेक’

शहरातील माेठे हाॅटेल, वाइन बार, खानावळी, मंगल कार्यालये तसेच रेस्टाॅरन्टमधून निघणारे उष्टे व शिळे अन्न संकलित करून त्याची वराह व्यावसायिकांना विक्री करण्याचा उद्याेग काही बहाद्दर वाहन चालकांनी सुरू केला हाेता. याबदल्यात संबंधित प्रतिष्ठानच्या संचालकांकडूनही अतिरिक्त पैसे दिले जात हाेते. त्यासाठी रात्री,बेरात्री घंटागाडीचा वापर केला जात हाेता.