शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील

By admin | Updated: September 14, 2014 01:52 IST

चोवीस तास राहणार वॉच : वृक्षतोड रोखण्यासाठी निर्णय

विवेक चांदूरकर अकोला : वृक्षांची होत असलेली कत्तल व वन्य प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी आता वनविभाग सरसावले आहे. राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या जंगलांवर आता आठवड्यातील २४ तास वनकर्मचारी व अधिकार्‍यांचा वॉच राहणार आहे. जंगलांची होत असलेली तोड, व त्याचे दिसणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविधि उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्येच राज्यातील सर्वच जंगल आता अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. पूर्वी वनाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधरण क्षेत्र, संवेदनशील व अतिसंवेदनशील क्षेत्र असे तीन प्रकार होते. आता सर्वसाधारण क्षेत्र व संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात आले असून, सर्वच क्षेत्र अतिसंवेदनशील करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधीत वनविभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच वन कर्मचारी व अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍याही वाढल्या आहेत. पूर्वी सर्वसाधारण व संवेदनशील क्षेत्र असलेल्या कर्मचार्‍यांवर जास्त ताण नव्हता. आता मात्र, बिट गार्डला दररोज बीट निरीक्षण करून नोंदी कराव्या लागतील. तसेच दैनंदिनीही प्रलंबित ठेवता येणार नाही. वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना साहाप्तीक दैनंदिनी व वनसंरक्षकांना मासिक दैनंदिनी न चुकता सादर करावी लागणार आहे. सर्वच जंगलांच्या सीमा आखून, त्यावर खुणा करून त्या मजबुत कराव्या लागणार आहे. अतिसंवेदनशील जंगल अखत्यारित असलेल्या वन व वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील उपवनसंरक्षकापासून तर बिट गार्डपर्यंत सर्वांच्याच जबाबदार्‍या वाढल्या आहेत. ** बिट गार्ड, वनकर्मचारी नेहमीच गस्तीवर सर्वच जंगले अतिसंवेदनशील झाल्यामुळे आता बिट गार्ड व वन कर्मचार्‍यांना नेहमीच गस्तीवर राहावे लागणार आहे. आपल्या अखत्यारित असलेल्या जंगलात येणार्‍या जाणार्‍यांच्या नोंदी घेणे, जंगल परिसराची नियमित पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवालही त्यांना सादर करावा लागणार आहे.