शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

आता राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील

By admin | Updated: September 14, 2014 01:52 IST

चोवीस तास राहणार वॉच : वृक्षतोड रोखण्यासाठी निर्णय

विवेक चांदूरकर अकोला : वृक्षांची होत असलेली कत्तल व वन्य प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी आता वनविभाग सरसावले आहे. राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या जंगलांवर आता आठवड्यातील २४ तास वनकर्मचारी व अधिकार्‍यांचा वॉच राहणार आहे. जंगलांची होत असलेली तोड, व त्याचे दिसणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविधि उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्येच राज्यातील सर्वच जंगल आता अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. पूर्वी वनाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधरण क्षेत्र, संवेदनशील व अतिसंवेदनशील क्षेत्र असे तीन प्रकार होते. आता सर्वसाधारण क्षेत्र व संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात आले असून, सर्वच क्षेत्र अतिसंवेदनशील करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधीत वनविभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच वन कर्मचारी व अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍याही वाढल्या आहेत. पूर्वी सर्वसाधारण व संवेदनशील क्षेत्र असलेल्या कर्मचार्‍यांवर जास्त ताण नव्हता. आता मात्र, बिट गार्डला दररोज बीट निरीक्षण करून नोंदी कराव्या लागतील. तसेच दैनंदिनीही प्रलंबित ठेवता येणार नाही. वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना साहाप्तीक दैनंदिनी व वनसंरक्षकांना मासिक दैनंदिनी न चुकता सादर करावी लागणार आहे. सर्वच जंगलांच्या सीमा आखून, त्यावर खुणा करून त्या मजबुत कराव्या लागणार आहे. अतिसंवेदनशील जंगल अखत्यारित असलेल्या वन व वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील उपवनसंरक्षकापासून तर बिट गार्डपर्यंत सर्वांच्याच जबाबदार्‍या वाढल्या आहेत. ** बिट गार्ड, वनकर्मचारी नेहमीच गस्तीवर सर्वच जंगले अतिसंवेदनशील झाल्यामुळे आता बिट गार्ड व वन कर्मचार्‍यांना नेहमीच गस्तीवर राहावे लागणार आहे. आपल्या अखत्यारित असलेल्या जंगलात येणार्‍या जाणार्‍यांच्या नोंदी घेणे, जंगल परिसराची नियमित पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवालही त्यांना सादर करावा लागणार आहे.