शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ नाही ! शनिवार, रविवारीही दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:34 IST

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी घोषित करण्यात आलेले शनिवार व रविवारी जिल्ह्यात संपूर्ण ...

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी घोषित करण्यात आलेले शनिवार व रविवारी जिल्ह्यात संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढला असून, जिल्ह्यात शनिवार व रविवारचे संपूर्ण लाॅकडाऊन रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि आस्थापना खुल्या राहणार आहेत.

जिह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ५ मार्चपासून जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देत, प्रत्येक शनिवार व रविवारी दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गत ४ मार्च रोजी दिला होता. त्यानुसार प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, शनिवार व रविवारी जिल्ह्यात घोषित केलेले संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केली. शनिवार व रविवारी जिल्ह्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. लाॅकडाऊन राहणार नाही; मात्र नागरिकांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व मास्कचा वापर करून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. त्यानुसार शनिवार व रविवारी जिल्ह्यातील संपूर्ण लाॅकडाऊन रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. त्यानुषंगाने शनिवार व रविवारी या देान दिवसांतही जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने व आस्थापना खुल्या ठेवण्यास मुभा राहणार आहे.