शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शौचालय नाय तर वेतन नाय!

By admin | Updated: November 28, 2015 02:35 IST

स्वच्छता प्रमाणपत्रासाठी शिक्षकांची मनपात धाव.

नितीन गव्हाळे/ अकोला: भारत स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागासह शहरी भागामध्येसुद्धा हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांंंमधून सुशिक्षित समाज घडविण्यासाठी त्यांना धडे देणार्‍या शिक्षकांकडेसुद्धा शौचालय आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी शहरी भागातील जिल्हा परिषद, खासगी शाळांमधील शिक्षकांना स्वच्छता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षकाकडे ह्यशौचालय नाय. तर वेतन नाय..ह्ण अशीच भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिक्षक महापालिकेत धाव घेत आहेत. शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक म्हणून गणला जातो. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांच्याच माध्यमातून होते; परंतु त्यांच्याच घरी शौचालय नसेल, तर समाजाने कोणता धडा घ्यावा? शिक्षक ही जबाबदार व्यक्ती असल्याने, त्यांच्या घरी शौचालय आहे की नाही, याबाबत पडताळणी शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. घरात शौचालय असल्याचे सप्रमाण सिद्ध करा आणि वेतन घ्या, अशीच भूमिका शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षण विभागाच्या या भूमिकेमुळे शहरी भागात राहणार्‍या शिक्षकांनी घरी शौचालय असल्याचे स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महापालिकेत धाव घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात जाऊन शहरातील शिक्षक प्रमाणपत्र देण्याची विनंती करीत आहेत. आम्हाला वेतनापासून वंचित राहावे लागेल, अशी गळ ते अधिकार्‍यांना घालत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकविणार्‍या शिक्षकांनासुद्धा नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतकडून स्वच्छता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. स्वच्छता प्रमाणपत्र शिक्षण विभागात जमा केल्याशिवाय शिक्षकांचे वेतनच त्यांच्या खात्यात जमा होणार नसल्याने, स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिक्षकांची एकच गर्दी होत आहे. शिक्षक उघड्यावर शौचास जात असल्याचे आले निदर्शनास ग्रामीण भागातील शिक्षक राहत्या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाचा वापर करीत नसून, उघड्यावर शौचास बसून सार्वजनिक आरोग्यास बाधा पोहोचवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने याबाबत कठोर निर्णय घेतला. त्यानुसार, घरी शौचालय आहे की नाही, याची खात्री पटविण्यासाठीच प्रत्येक शिक्षकाला स्वच्छता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.