शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

‘नो मास्क-नो पेट्रोल’ला पंपचालकांकडून हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहरातील आणि लगतच्या भागातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो मास्क - नो पेट्रोल’चे ...

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शहरातील आणि लगतच्या भागातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो मास्क - नो पेट्रोल’चे फलक पंपावर लावले. मात्र, प्रत्यक्षात या नियमाच्या अंमलबजावणीकडेच दुर्लक्ष होत असल्याने पेट्रोलपंप परिसर कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्व व्यावसायिकांनी त्यांना ठरवून दिलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला होता; मात्र कारवाई थंडावली आहे.

आठवड्यात उष्णतामान वाढणार!

उन्हाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशांच्या जवळपास जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यातच अकोला शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

शहरातील सोमवारचे तापमान ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा होता. शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३६ टक्के होती. ती सायंकाळी घटून १६ टक्क्यांवर आली. त्यामुळे सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता. विदर्भात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूरचे तापमान ३७ अंशांवर राहिले.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अकोल्यात मंगळवार आणि बुधवार ४० अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

तापमानात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालेभाज्या, भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर पिकास जमिनीतील ओलावा बघून आवश्यकतेनुसार ओलीत करावे. परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असेही सुचविण्यात आले आहे.