शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

नवी पिढी बिघडलेली नाही, भरकटली- अण्णासाहेब मोरे

By admin | Updated: March 7, 2017 02:12 IST

श्री सर्मथ पब्लिक स्कूलचा शिलान्यास संपन्न; हजारो सेवेकरी उपस्थित.

अकोला, दि. ६- आजच्या घडीला प्रत्येकाला आपल्या पाल्यांची काळजी लागली आहे. मुले अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक आकर्षित होत आहेत. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना नवीन पिढी बिघडत असल्याची काळजी सतावतेय; त्यांना योग्य मार्ग आपणच दाखवू शकतो. त्यानंतर शिक्षकांचे कार्य सुरू होते, असे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी सर्मथ बाल संस्कार केंद्राचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. शिक्षण क्षेत्रात गेल्या २0 वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्य करणार्‍या अकोल्यातील श्री सर्मथ शिक्षण समूहाच्या श्री सर्मथ पब्लिक स्कूलची भव्य वास्तू राष्ट्रीय महामार्ग सहावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ साकारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन व शिलान्यास सोहळा सोमवार, ६ मार्च रोजी सायं. ४ वाजता दिंडोरीप्रणित श्री स्वामी सर्मथ केंद्राचे सद्गुरू अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी समूहाचे संस्थापक प्रा. नितीन बाठे व श्री सर्मथ एज्युकेशन परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते. समारंभादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णासाहेब म्हणाले की, पालकांनी पाच ते आठ वर्षे वयोगटातील बालकांना जीवनाचे मौलिक शिक्षण द्यायला हवे. यामुळे नातेवाईक, शेजारी व शिक्षकवृंदांसोबत कसे वर्तन ठेवायचे, याचे ज्ञान मुलांना बालवयातच होईल. जीवनातील पाच गुरूंचे महत्त्व यावेळी अण्णासाहेबांनी विशद केले. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरू हा त्याचे आई-वडील असतात. बालकांना सुसंस्कारित करण्याचे कार्य माता-पिता करीत असतात. प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक हे दुसरे गुरू. तिसरे गुरू हे उच्च शिक्षण प्रदान करणारे शिक्षक आहेत, तर चौथे गुरू रोजगार प्राप्त करण्यासाठी सहाय्य करतात. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात पाचवा गुरू असणे गरजेचे आहे. अनंत अडचणींचा सामना करीत पाचव्या गुरूच्या प्राप्तीनंतर मनुष्याला मन:शांती व आत्मिक समाधानाची अनुभूती होते. श्री राजराजेश्‍वर नगरीत तीन श्री स्वामी केंद्रे स्थापित झाली आहेत. संस्कृतीच्या व राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी अभ्यासक, उपासक, प्रचारक आणि प्रसारक होण्याचे आवाहन गुरुमाउलींनी यावेळी केले.