लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : स्थानिक जुने शहरातील बजरंग चौकातील रहिवासी २८ वर्षीय सागर ऊर्फ धनंजय शरद मदनकर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) कमांडो म्हणून कार्यरत असून, सदर युवकाचा विवाह अमरावती जिल्ह्यात १४ मार्च रोजी निश्चित होऊन १५ जूनला लग्न ठरले होते. लग्नाच्या पत्रिकाही वितरित करण्यात आल्या आहेत. लग्नाला आठ दिवसांचा अवधी असताना वधूपित्याने लग्न होणार नसल्याचे वराकडील मंडळींना सांगितले. त्यामुळे वराकडील मंडळींनी पोलिसांत धाव घेतली असून, विश्वासघात केल्याची तक्रार केली आहे, तसेच ८० हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नियोजित वधूचा लग्नास नकार; पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 02:17 IST