शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

तरूणांनी स्वयंरोजगारातून विकास साधण्याची गरज

By admin | Updated: January 14, 2015 23:32 IST

ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे राज्य समन्वयक व्ही.एम.पोतदार यांचे आवाहन.

बुलडाणा : ग्रामिण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सर्वार्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी संस्था आहे. विनामुल्य प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, बँकांकडून भांडवलासाठी पाठपुरावा, तसेच प्रशिक्षणार्थ्याला दोन वर्ष विनामुल्य मार्गदर्शन अशा स्वरूपात अन्य कोणलीही संस्था मदत करीत नाही. केंद्र सरकारचा हा उपक्रम असून, या संधीचा लाभ घेऊन आपणच आपला रोजगार निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे मत ग्रामिण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे राज्य समन्वयक व्ही.एम.पोतदार यांनी लोकमत शी बोलतांना व्यक्त केले.*प्रश्न : ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची रचना कशी आहे ?ग्रामिण विकास व स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था असे या संस्थेचे नाव असून, ही संस्था केंद्र सरकार, राज्य सरकार व बँकांच्या मदतीने चालते. राज्यात ३५ ठिकाणी संस्थेची कार्यालये असून, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १ कोटी रूपये खचरून संस्थेचे अद्ययावत असे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना आहे. ठाणे, लातूर, जळगाव येथील इमारती पूर्णत्वास गेल्या असून, इतर जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध होताच प्रशिक्षण केंद्राच्या वास्तू तयार होतील. या केंद्रामध्ये बेरोजगार तरूणांना विविध व्यवसायांचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभारणीसाठी बँकांकडे पाठपुरावा केला जातो.*प्रश्न : प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असते?आमच्या संस्थेद्वारा तब्बल १७८ प्रकारच्या प्रशिक्षणांची व्यवस्था केली आहे. यामध्ये शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांची संख्या ४५ आहे. ज्या भागामध्ये प्रशिक्षण आयोजित करायचे आहे, त्या परिसराची गरज काय, याचाही विचार करून प्रशिक्षणामध्ये बदल केला जातोप्रश्न : प्रशिक्षण शिबिराचे संचालन कसे होते?दारिद्रय रेषेखालील कोणतीही व्यक्ती या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकते. संपूर्ण विनामुल्य तसेच निवासी स्वरूपाचे हे शिबीर असते. शिबिरामध्ये परिसरातील तज्ज्ञ व्यक्ती व्यवसायाचे स्वरूप पाहून आठ दिवसांपासून तर महिनाभरापर्यंत प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय ज्ञानासोबतच व्यक्तीमत्व विकास, क्षमता बांधणी यांचाही विचार केला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबधिताला व्यवसाय करण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करणे, तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संस्था मदत करते. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांचा दोन वर्ष पाठपुरावा घेत असतो, त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला, याचे समाधान आहे.प्रश्न : आतापर्यत किती लोकांना रोजगार दिला?संस्थेमार्फत राज्यात आतापर्यंत ७ लाख ४५ हजार तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी ४ लाख ४२ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. बुलडाण्याचा विचार केला, तर येथील केंद्र संचालक पी.एन.सावजी व संयोजन प्रमुख चंद्रशेखर केणे यांनी गेल्या वर्षभरात २१ प्रशिक्षण शिबिरे घेतली. यातून ४३0 लोकांना प्रशिक्षण दिले व त्यापैकी १४५ लोक बँकांच्या मदतीने रोजगार उभारू शकले आहेत.प्रश्न : अशा प्रशिक्षण शिबिरांकडे लोकांचा कल आहे का?दूदैवाने हवा तसा नाही ! अजूनही तरूणांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. आमचे प्रशिक्षण हे विनामुल्य आहे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लिड बँका यांच्या मदतीने आम्ही रोजगाराच्या दारापर्यंत तरूणांना नेतो. जातीची, शिक्षणाची कोणतीही अट नाही. त्यामुळे प्रकल्पासंदर्भात जागृती निर्माण करून तरूणांना त्यांच्यामधील क्षमतेची जाणीव करून दिली पाहिजे.