शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जासाठी नकारघंटा!

By admin | Updated: June 22, 2017 04:55 IST

शासनाचा आदेशच नाही : ३१ हजार शेतक-यांच्या बँकेत चकरा.

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार दहा हजार रुपये मदत देण्यासही जिल्हतील राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका तयार नाहीत. त्यामुळे १४ जूनपासून शेतकर्‍यांनी बँकांचे उंबरठे झिजवले, तरी त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्याचवेळी शासनाकडून तसा कोणताच आदेश प्राप्त नसल्याचेही बँक व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच बिथरले आहेत.शासनाने कर्जमाफी देण्याचा आदेशातील निकषांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. त्यातच थकबाकीदार शेतकरी ठरवताना ३0 जून २0१६ ची मुदत निश्‍चित केली. त्या दिवशी कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांना खरीप पेरणीसाठी किमान दहा हजार रुपये कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांनाच दिले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा उल्लेख नाही. त्यातच राष्ट्रीयीकृत बँका राज्य शासनाचा आदेश मानत नाहीत. त्या बँकांना भारतीय रिझर्व्ह बँक किंवा राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून आदेश मिळणे आवश्यक आहे. आतापर्यंत तसा आदेश मिळालाच नसल्याची माहिती आहे. जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँक खातेदारांचे प्रमाण ५२:४८ असे असताना मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांची गैरसोय झाली आहे. शासनाने केलेल्या थकबाकीदार शब्दाच्या व्याख्येत बसणार्‍या शेतकर्‍यांना तरी राष्ट्रीयीकृत बँकांनी दहा हजार रुपये कर्ज देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील २३ पैकी कोणत्याही बँकेच्या शाखेत वाटप सुरूच नसल्याची माहिती आहे. आधीच कर्जमाफीची हवा गरम असताना शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना कर्ज न मिळणे, ही बाब संतापजनक ठरत आहे. त्यातून शासन आदेशाच्या फोलपणावरही शेतकर्‍यांचा रोष वाढत आहे. पात्र थकबाकीदार ७५ हजारशासनाने दिलेल्या मुदतीत थकबाकीदार म्हणून पात्र असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ७५ हजार आहे, त्यापैकी ४४ हजार जिल्हा बँकेत, तर ३१ हजार शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार आहेत. जिल्हा बँकेने आधीच वसुली करून वाटप सुरू केल्याची माहिती आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडे पात्र असलेल्या शेतकर्‍यांनी धाव घेतली असता शासनाचा कोणताही आदेश मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये जिह्यातील २३ बँकांच्या शाखांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँक किंवा बँकर्स समितीचा आदेश अद्याप मिळाला नाही. शेतकर्‍यांनी कर्ज मिळण्यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण केल्यास त्यांना ते मिळण्यास अडचण नाही. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.शासनाने सर्वच बँकांना आदेश दिला आहे. त्यानुसार बँकांनी शेतकर्‍यांना कर्जवाटप करणे आवश्यक आहे. राष्ट्रीयीकृत बँका उपस्थित करीत असलेला मुद्दा वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्याबाबत शासनाला कळवले जाईल. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.