शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नामसंकीतर्नच मनुष्याचे उद्धारक

By admin | Updated: November 14, 2014 00:47 IST

अकोला येथील नारदीय कीर्तन महोत्सवातील दुस-या पुष्पात देवरस यांचे प्रतिपादन.

अकोला : प्रत्येक युगाचा आपला एक धर्म आहे. कलियुगाचा धर्म नामसंकीर्तन हाच आहे. परमेश्‍वराचे नामसंकीर्तन केले तर अनंत पापाच्या राशी नासल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मनुष्याने नामसंकीर्तनाला महत्त्व दिले पाहिजे. नामसंकीर्तनातुनच मनुष्याचा उद्धार आहे, असे मत नागपूर येथील ह.भ.प. मुकुंदबुवा देवरस यांनी गुरुवारी अकोल्यात व्यक्त केले. श्री ब्रह्मचैतन्य धार्मिक सेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित नाईकवाडे कीर्तन महाविद्यालयाच्या वतीने व प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या सहकार्याने आयोजित नारदीय कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना मुकुंदबुवा देवरस बोलत होते. देवरस यांनी निरुपनासाठी संत तुकारामांचा ह्यनाम संकीर्तन साधन पै सोपे, फिटतील पापे जन्मांतरीचेह्ण हा अभंग घेतला. नामसंकीर्तनचे महत्त्व सांगताना बुवांनी अनेक दृष्टांत दिले. भक्तीचे जे नवप्रकार आहेत त्यात नाम हे सर्वात सुलभ साधन आहे. नामाचा महिमा संतांनी देखील गायिला आहे. ईश्‍वराची प्राप्ती करायची असेल, तर नामासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. कलियुगात नामच एकमेव असे साधन आहे, जे मनुष्याला या संसारातून तारून नेईल. म्हणूनच उठता-बसता, जेवताना-झोपतांना प्रभूचे नामसंकीर्तन केले पाहिजे, असे मुकुंदबुवा यांनी सांगितले. याप्रसंगी भाऊसाहेब नाईकवाडे यांच्या हस्ते बुवांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनात संवादिनीवर श्रीकिसन जयस्वाल, तबल्यावर मनोज जहागिरदार यांनी तर टाळाची साथ धनश्री मुळावकर यांनी दिली. संचालन वानखडे यांनी केले. शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी नारदीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे.