शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
3
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
4
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
5
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
6
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
7
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
8
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
10
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
11
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
12
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
13
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
14
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
17
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
18
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 

नाफेड, पणन महासंघाच्या शेतमाल खरेदीस विलंब

By admin | Updated: October 10, 2014 23:53 IST

सोयाबीन, कापसाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त.

खामगाव (बुलडाणा) : शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी नाफेड तसेच पणन महासंघामार्फत प्र त्येक तालुकास्तरावर केंद्र उघडून शेतमालाची खरेदी करण्यात येते; मात्र यावर्षी अद्यापही हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याने व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे.यावर्षी नैसर्गिक संकटांची मालिकाच शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे. यंदा पाऊस विलंबाने आल्याने, पेरण्या रखडल्या. परिणामी शेतकर्‍यांचे पीक नियोजन कोलमडून, अन्य पिकांची पेरणी करावी लागली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने, अनेकांचे सोयाबीन पीक शेंगा परिपक्व होण्याआधीच वाळले. तसेच कापसावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यावर्षी पेरणीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. शेतकर्‍यांना उत्पादन तर कमी मिळालेच, शिवाय उत् पादनाला भावसुध्दा मिळाला नाही. शेतमालास हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून नाफेड तसेच पणन महासंघामार्फत उडिद, मूग, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि कापसाची खरेदी करण्यात येते; मात्र यावर्षी राज्यात कुठेही खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळे याचा फायदा घेत, व्यापारी शेतकर्‍यांचा शेतमाल हमीदरापेक्षाही कमी दराने खरेदी करीत आहेत. दिवाळी तसेच रब्बीचा हंगामासाठी शेतकर्‍यांना नाईलाजाने कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे.