शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मूर्तिजापूर : तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात गत तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवारात पाणी शिरल्याने ...

मूर्तिजापूर : तालुक्यात गत तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शिवारात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच तालुक्यात अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा सर्व्हे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, नदीकाठच्या शिवारात, गावामधे पाणी शिरल्यामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे हतबल असतानाच शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करुन, बँकेचे कर्ज काढून पेरणी केली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सद्या शेतकऱ्यांची पिके घरात येण्याची वेळ असतानाच अस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त गावांचा तत्काळ सर्व्हे व पंचनामा करण्याचा आदेश देऊन आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना यांची उपस्थिती

निवेदन आ. हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाकजर, कमलाकर गावंडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, राजेंद्र इंगोले, विजय डोईफोडे, धनंजय ढोक, संदीप जळमकर, अमोल पिंपळे, साहेबराव राऊत, कुलदीप सदार, नीलेश वानखडे, विशाल सिंहे, मधुकरराव अव्वलवार, मंगेश पाचडे, गणेश ढाकरे, पद्माकर पाचडे, राजाभाऊ देशमुख, डॉ. वडुरकर, दिग्विजय गाडेकर, पवन भटकर, संतोष तळेकर, प्रमोद टाले, अभय पांडे, अर्पित गावंडे, अतुल टाले, अतुल इंगोले, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानेश महामुने यांची तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.