शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसीची दहशतच जास्त

By admin | Updated: December 2, 2015 02:41 IST

शासनाने पीआरसी रद्द करावी, आ. श्रीकांत देशपांडे यांचे मत, ९, १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन.

शेगाव (बुलडाणा): पंचायती राज समितीचा (पीआरसी) धाक कमी आणि दहशतच जास्त असून, शासनाने ही समितीच रद्द करावी असे मत आ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक नकाशे यांच्या आत्महत्याप्रकरणी नियमानुसार आमदारांवर गुन्हे दाखल करायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली. विविध मागण्यांसाठी मंगळवारी शेगाव येथून आ. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या पायदळ दिंडीला सुरुवात झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेला पंचायत राज समितीच्या सदस्यांनी भेट दिल्यानंतर, या शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी तणावातून शाळेतच आत्महत्या केली. नकाशे हे परिस्थितीचे बळी ठरले आहेत. पंचायत राज समितीची दहशत पसरली असून, ही समितीच रद्द होणे गरजेचे आहे. इतर तक्रारींवर होणार्‍या कारवाईप्रमाणे या तक्रारीवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या पायदळ दिंडीबाबत बोलताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ. कपिल पाटील, आ. विक्रम गाळे यांनी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणार्‍या विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालयांवर आणि विनाअनुदानीत शाळांवर काम करणार्‍या प्राध्यापक आणि शिक्षकांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सांगून, त्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. आरएसएस आणि भाजपाचा गढ असलेल्या नागपुरात गल्लोगल्लीत शिक्षक भिक मागणार आहेत. तरीही शासनाला दया आली नाही, तर सभागृह बंद पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी ९ व १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन करणार असून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, विभाग अध्यक्ष सय्यद राजिक, पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते.