शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

पीआरसीची दहशतच जास्त

By admin | Updated: December 2, 2015 02:41 IST

शासनाने पीआरसी रद्द करावी, आ. श्रीकांत देशपांडे यांचे मत, ९, १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन.

शेगाव (बुलडाणा): पंचायती राज समितीचा (पीआरसी) धाक कमी आणि दहशतच जास्त असून, शासनाने ही समितीच रद्द करावी असे मत आ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक नकाशे यांच्या आत्महत्याप्रकरणी नियमानुसार आमदारांवर गुन्हे दाखल करायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली. विविध मागण्यांसाठी मंगळवारी शेगाव येथून आ. श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या पायदळ दिंडीला सुरुवात झाली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह येथील शाळेला पंचायत राज समितीच्या सदस्यांनी भेट दिल्यानंतर, या शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी तणावातून शाळेतच आत्महत्या केली. नकाशे हे परिस्थितीचे बळी ठरले आहेत. पंचायत राज समितीची दहशत पसरली असून, ही समितीच रद्द होणे गरजेचे आहे. इतर तक्रारींवर होणार्‍या कारवाईप्रमाणे या तक्रारीवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या पायदळ दिंडीबाबत बोलताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ. कपिल पाटील, आ. विक्रम गाळे यांनी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणार्‍या विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालयांवर आणि विनाअनुदानीत शाळांवर काम करणार्‍या प्राध्यापक आणि शिक्षकांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सांगून, त्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. आरएसएस आणि भाजपाचा गढ असलेल्या नागपुरात गल्लोगल्लीत शिक्षक भिक मागणार आहेत. तरीही शासनाला दया आली नाही, तर सभागृह बंद पाडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी ९ व १0 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन करणार असून शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, विभाग अध्यक्ष सय्यद राजिक, पद्माकर इंगळे आदी उपस्थित होते.