शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटला; पण मिळाली नाही मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

जिल्ह्यात गत २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. मूसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्यात ...

जिल्ह्यात गत २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. मूसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्यात बुडाली तसेच शतजमीनही खरडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १० आॅगस्ट रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. शेती व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित निधीची मागणीही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; मात्र अहवाल पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शासनाकडून मदतनिधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेती आणि पीक नुकसान भरपाइची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !

क्षेत्राचा प्रकार शेतकरी बाधीत क्षेत्र (हेक्टर)

जिरायत पिके १७८०८३ १२१२९५.३६

बागायत पिके १०४१ ५७९.१८

फळपिके ९०९ ५८२. ३३

खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८. ०७

...............................................................................................

११५.३५ कोटींचा मदतनिधी

मिळणार तरी केव्हा?

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार १२६ रुपयांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे. परंतु शासनाकडून अद्याप मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेती आणि पीक नुकसान भरपाइच्या मदतीचा निधी शासनाकडून मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.