शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

महिना उलटला; पण मिळाली नाही मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

जिल्ह्यात गत २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. मूसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्यात ...

जिल्ह्यात गत २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. मूसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिके पाण्यात बुडाली तसेच शतजमीनही खरडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १० आॅगस्ट रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि पिकांचे नुकसान झाले. शेती व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अपेक्षित निधीची मागणीही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली; मात्र अहवाल पाठवून एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शासनाकडून मदतनिधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेती आणि पीक नुकसान भरपाइची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !

क्षेत्राचा प्रकार शेतकरी बाधीत क्षेत्र (हेक्टर)

जिरायत पिके १७८०८३ १२१२९५.३६

बागायत पिके १०४१ ५७९.१८

फळपिके ९०९ ५८२. ३३

खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८. ०७

...............................................................................................

११५.३५ कोटींचा मदतनिधी

मिळणार तरी केव्हा?

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेती आणि पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार १२६ रुपयांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली आहे. परंतु शासनाकडून अद्याप मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेती आणि पीक नुकसान भरपाइच्या मदतीचा निधी शासनाकडून मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.