शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पावसाळा लांबला; शेतक-यांची घालमेल!

By admin | Updated: June 13, 2016 01:54 IST

बियाणे बाजारात पुन्हा संभ्रमावस्था; मशागतीच्या कामांना ‘ब्रेक’

अकोला: यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज सुरुवातीला सर्वच हवामानशास्त्र संस्थांनी वर्तविला आहे; परंतु नवीन अंदाजानुसार मॉन्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात येत असल्याने चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. त्याचे परिणाम मशागत व बियाणे बाजारावर दिसून येत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता, आता तर पाऊस नाही आणि तापमानही वाढले आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तर या सर्व पृष्ठभूमीवर आपत्कालीन पीक पेरणीचे नियोजन केले आहे.विदर्भात गत १0 ते १५ वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कृषी विकासाचा दर शून्यावर आला असून, शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी उत्तम पावसाचे संकेत सर्वच हवामानशास्त्र विभाग, खासगी संस्थांनी दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल वाढली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी सरसावलेला शेतकरीसुद्धा ह्यवेट अँड वॉचह्णच्या भूमिकेत आहे. शेतकरी दरवर्षी पावसाळ्य़ापूर्वी बी-बियाणे, खते खरेदी करतो. यावर्षी मात्र बियाणे खरेदीस शेतकरी तयार नसल्याचे बाजारातील चित्र आहे. विदर्भात ३0 जूननंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाल्यास, मुगाचे पेरणीबाबत शेतकरी फेरविचार करीत असतो.दरम्यान, कृषी विद्यापीठाने यावर्षी वेळेवर मॉन्सून येत असल्याचा अंदाज बघून, पीक पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु मॉन्सून ३0 जूनपर्यंत आला नाही, तर खरिपातील काही पिकांमध्ये बदल करावा लागेल. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक असते. तथापि, नियमित पावसाळा दोन आठवडे उशिराने सुरू झाल्यास कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केल्या आहेत. पश्‍चिम विदर्भात अडीच लाख क्विंटल विविध पिकांचे बियाणे बाजारात आले आहे. परंतु खरेदी वाढली नसल्याने बियाणे विक्रेते शेतकर्‍यांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत.