शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबला; शेतक-यांची घालमेल!

By admin | Updated: June 13, 2016 01:54 IST

बियाणे बाजारात पुन्हा संभ्रमावस्था; मशागतीच्या कामांना ‘ब्रेक’

अकोला: यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज सुरुवातीला सर्वच हवामानशास्त्र संस्थांनी वर्तविला आहे; परंतु नवीन अंदाजानुसार मॉन्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात येत असल्याने चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणार्‍या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. त्याचे परिणाम मशागत व बियाणे बाजारावर दिसून येत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला होता, आता तर पाऊस नाही आणि तापमानही वाढले आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तर या सर्व पृष्ठभूमीवर आपत्कालीन पीक पेरणीचे नियोजन केले आहे.विदर्भात गत १0 ते १५ वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. कृषी विकासाचा दर शून्यावर आला असून, शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी उत्तम पावसाचे संकेत सर्वच हवामानशास्त्र विभाग, खासगी संस्थांनी दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांच्या जिवाची घालमेल वाढली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी सरसावलेला शेतकरीसुद्धा ह्यवेट अँड वॉचह्णच्या भूमिकेत आहे. शेतकरी दरवर्षी पावसाळ्य़ापूर्वी बी-बियाणे, खते खरेदी करतो. यावर्षी मात्र बियाणे खरेदीस शेतकरी तयार नसल्याचे बाजारातील चित्र आहे. विदर्भात ३0 जूननंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाल्यास, मुगाचे पेरणीबाबत शेतकरी फेरविचार करीत असतो.दरम्यान, कृषी विद्यापीठाने यावर्षी वेळेवर मॉन्सून येत असल्याचा अंदाज बघून, पीक पेरणीचे नियोजन केले आहे; परंतु मॉन्सून ३0 जूनपर्यंत आला नाही, तर खरिपातील काही पिकांमध्ये बदल करावा लागेल. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक असते. तथापि, नियमित पावसाळा दोन आठवडे उशिराने सुरू झाल्यास कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केल्या आहेत. पश्‍चिम विदर्भात अडीच लाख क्विंटल विविध पिकांचे बियाणे बाजारात आले आहे. परंतु खरेदी वाढली नसल्याने बियाणे विक्रेते शेतकर्‍यांची प्रतीक्षा करताना दिसत आहेत.