शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आमदारांनी विमा प्रतिनिधीला खडसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे उगवले नाही. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले; परंतु ...

अकोला : जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे उगवले नाही. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले; परंतु जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी फक्त तेल्हारा तालुक्यात सोयाबीन पीकविमा मंजूर झाला. इतर ५१ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा कशाच्या आधारे नाकारण्यात आला, याचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असे आदेश अकोला पूर्वचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दिले.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान होऊनही पीकविमा मात्र जिल्ह्यातील ५२ पैकी एका महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर केला व ५१ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. हे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात होत असल्याने हे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून शेतकरी विरोधी काम करीत आहे. सोयाबीनला पीक विमा कोणत्या निकषाच्या आधारे नाकारण्यात आला, याचा संपूर्ण अहवाल विमा कंपनीने सात दिवसांच्या आत सादर करण्याचा आदेश विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांच्या सोबत माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माधव मानकर, अंबादास उमाळे, ॲड. अभय थोरात, राजेश बेले, राजेश्वर वैराळे, विनायक वैराळे, गणेश तायडे, डाॅ. अमित कावरे, आदींसह बहुसंख्य शेतकरी हजर होते.