शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय? नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट ...

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात,

पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच. परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर अयोग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे यात नुकसान व्हायला नको.

-डॉ.विजय नानोटी, प्राचार्य, रालतो विज्ञान महाविद्यालय

नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची. राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या. नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमइआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.

-प्रा. ललित काळपांडे, शिक्षण तज्ज्ञ

विद्यार्थी काय म्हणतात,

नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत.

-ऋषिकेश वहिले, विद्यार्थी बारावी

फोटो:

बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.

-ओजस्वी अविनाश बोर्डे, विद्यार्थिनी बारावी

फोटो:

नीट परीक्षा घेऊनच वैद्यकीय प्रवेश द्यावेत. यातून योग्य व सक्षम विद्यार्थी निवडले जातील. देशाला दर्जेदार डॉक्टर मिळतील. अन्यथा गुणवंत व क्षमता असलेले विद्यार्थी मागे राहतील. वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीतील गुणांचा विचार होऊ नये.

-मानसी सुनील साठे, विद्यार्थिनी बारावी

फोटो: