शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय? नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट ...

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षा होण्याच्या आधी तामिळनाडू राज्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी भूमिका तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी, पालक व तेथील सत्ताधारी सरकारने घेतली. नीट परीक्षेतून राज्यातील सूट देणारे विधेयक तामिळनाडू सरकारने विधानसभेत मांडले आणि संमतही केले. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. या विधेयकाद्वारे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली आहे.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात,

पूर्वी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्यात येत होते. स्पर्धात्मक परीक्षा नव्हती. नीट व इतर परीक्षांच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश द्यावेत. नीट परीक्षा आवश्यक आहेच. परंतु बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश झाले तर अयोग्य ठरणार नाही. गुणवंत विद्यार्थ्यांचे यात नुकसान व्हायला नको.

-डॉ.विजय नानोटी, प्राचार्य, रालतो विज्ञान महाविद्यालय

नीट लागू झाली तेव्हापासून तामिळनाडू सरकार विरोध करीत आहे. सीईटी व्हायची. राज्यापुरती स्पर्धा व्हायची. नीटमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या संधी वाढल्या. १५ टक्के जागा विद्यार्थ्यांच्या वाढल्या. नीट परीक्षेमुळे आता सीईटी, एआयआयएमएस, जेआयपीएमइआर, एआयपीएमटी या परीक्षा द्याव्या लागत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट परीक्षाच योग्य आहे.

-प्रा. ललित काळपांडे, शिक्षण तज्ज्ञ

विद्यार्थी काय म्हणतात,

नीट परीक्षेमध्ये स्टेट बोर्डापेक्षा अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो. नीट परीक्षेमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होते. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश व्हावेत.

-ऋषिकेश वहिले, विद्यार्थी बारावी

फोटो:

बारावीतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश नकोच. नीट परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश मिळावेत. या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवंत विद्यार्थी मेडिकलला जातील. बारावीच्या आधारे वैद्यकीय प्रवेश दिले तर गुण आणि आरक्षणाचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसेल.

-ओजस्वी अविनाश बोर्डे, विद्यार्थिनी बारावी

फोटो:

नीट परीक्षा घेऊनच वैद्यकीय प्रवेश द्यावेत. यातून योग्य व सक्षम विद्यार्थी निवडले जातील. देशाला दर्जेदार डॉक्टर मिळतील. अन्यथा गुणवंत व क्षमता असलेले विद्यार्थी मागे राहतील. वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीतील गुणांचा विचार होऊ नये.

-मानसी सुनील साठे, विद्यार्थिनी बारावी

फोटो: