शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कन्येचा विवाह, काेराेना नियमातही जाेपासले सामाजिक दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST

अकाेला: आधीच दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर काेराेनाच्या संकटाचाही बाेजा पडला आहे. काेराेनाच्या नियमांमध्ये शेती ...

अकाेला: आधीच दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर काेराेनाच्या संकटाचाही बाेजा पडला आहे. काेराेनाच्या नियमांमध्ये शेती काम व शेतमाल विक्रीची सवलत असली तरी सर्व अर्थचक्रच ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाच आहे. अशा स्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलीच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प केला आहे. काेराेनाच्या नियमांचे काटेकाेर पालन करून साेमवारी अशाच एका शेतकरी कन्येचा विवाह बाळापुरात पार पडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर अकाेला ते बाळापूर दरम्यान मुरलीधर राऊत यांचे हाॅटेल आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. काेराेना नियमांमुळे विवाहावरच निर्बंध आले आहे. अशा स्थितीत केवळ २५ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पारस येथील गायत्री विशाल काटे हिचा विवाह खामगाव तालुक्यातील खुटपुरीचे निलेश सुधाकर गाेळसे यांच्याशी संपन्न झाला. वधू गायत्री हिच्या वडिलांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली हाेती. तिला एक भाऊ व बहीण आहे. आई उदरनिर्वाहासाठी घरकाम करते. त्यामुळे या कन्येच्या विवाहाचा पूर्ण खर्च राऊत यांची उचलला. या साेहळ्याला बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी आवर्जून उपस्थित हाेते.

पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल

मुरलीधर राऊत यांनी नाेटा बंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा या उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.

------------------

काेट

शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्न कार्याची जबाबदारी घेतली आहे. काेराेनाच्या संकटातही या जबाबदारीला पूर्ण करू शकलाे याचे समाधान आहे.

-मुरलीधर राऊत, बाळापूर