शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कन्येचा विवाह, काेराेना नियमातही जाेपासले सामाजिक दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST

अकाेला: आधीच दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर काेराेनाच्या संकटाचाही बाेजा पडला आहे. काेराेनाच्या नियमांमध्ये शेती ...

अकाेला: आधीच दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर काेराेनाच्या संकटाचाही बाेजा पडला आहे. काेराेनाच्या नियमांमध्ये शेती काम व शेतमाल विक्रीची सवलत असली तरी सर्व अर्थचक्रच ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाच आहे. अशा स्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलीच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प केला आहे. काेराेनाच्या नियमांचे काटेकाेर पालन करून साेमवारी अशाच एका शेतकरी कन्येचा विवाह बाळापुरात पार पडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर अकाेला ते बाळापूर दरम्यान मुरलीधर राऊत यांचे हाॅटेल आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. काेराेना नियमांमुळे विवाहावरच निर्बंध आले आहे. अशा स्थितीत केवळ २५ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पारस येथील गायत्री विशाल काटे हिचा विवाह खामगाव तालुक्यातील खुटपुरीचे निलेश सुधाकर गाेळसे यांच्याशी संपन्न झाला. वधू गायत्री हिच्या वडिलांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली हाेती. तिला एक भाऊ व बहीण आहे. आई उदरनिर्वाहासाठी घरकाम करते. त्यामुळे या कन्येच्या विवाहाचा पूर्ण खर्च राऊत यांची उचलला. या साेहळ्याला बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी आवर्जून उपस्थित हाेते.

पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल

मुरलीधर राऊत यांनी नाेटा बंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा या उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.

------------------

काेट

शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्न कार्याची जबाबदारी घेतली आहे. काेराेनाच्या संकटातही या जबाबदारीला पूर्ण करू शकलाे याचे समाधान आहे.

-मुरलीधर राऊत, बाळापूर