शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंद; उन्हाळी भुईमूग, कांदा पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात ...

कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. कृषी अवजारे, कृषी सेवा केंद्र व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद आहे. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक व तालुका स्तरावर संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. बाजार समित्या बंद असल्याने माल विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे. समोर खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यात माल विकता येत नसल्याने खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

दररोज होती सहा-सात हजार क्विंटल आवक

कडक संचारबंदीआधी शहरातील बाजार समितीमध्ये दररोज सहा-सात हजार क्विंटल मालाची आवक होती; परंतु बाजार समिती बंद असल्याने ही आवक बंद आहे. यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीनची सर्वाधिक आवक होती.

--बॉक्स--

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने भुईमूग व उन्हाळी सोयाबीन पडून आहे. खरिपाच्या तयारीसाठी भांडवलाची गरज आहे. माल विक्री करता येत नसल्याने अडचण होत आहे.

- किशोर नागरे, शेतकरी