शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

मराठा व ओबीसीमधील वाढती दरी गंभीर!

By admin | Updated: October 24, 2016 02:48 IST

सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

चिखली, दि. २३- मराठा आणि दलित यांचे व्यावहारिक संबंध परंपरागत आहेत. यांच्यातील भांडण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. हे भांडण महिनाभर अधिक वर्षभरा पुरते असते. तद्नंतर त्यांच्यात परस्परांवर अवलंबून असल्याने सलोखा निर्माण होतो; परंतु मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने निर्माण होत असलेली दरी मोठी आहे. त्याचबरोबर गंभीरदेखील. या दरीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून गैरविश्‍वास वाढीस लागला आहे. याला सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसेनजित पाटील, अशोकराव सोनुने, शरद वसतकार, अँड.राहुल धुरंधर, विनोद कळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अँट्रॉसिटी कायद्यासंदर्भात बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले, की अँट्रॉसिटीचा दुरुपयोग मराठय़ांकडूनच होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. याचा बोध घेऊन मराठय़ांनी त्याचा गैरवापर थांबविणे गरजेचे आहे. यासोबतच मराठा आणि मुस्लीम या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरजच नाही. या दोन्ही समाजाच्या समस्या वेगळय़ा आहेत. मुस्लिमांनी आपल्याला शिक्षण कुठल्या माध्यमातून घ्यायचे, उर्दू, मराठी, इंग्रजी की मदरशातून की शाळा, कॉलेजातून हे अगोदर ठरविले पाहिजे. जर मदरशातून घ्यायचे असेल तर त्यांना आरक्षण देऊन उ पयोग काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा समाजातील घरणेशाही सं पुष्टात आणून सर्वसामान्य गरीब मराठय़ांच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने त्या घराणेशाहीच्या विरोधातील असंतोषदेखील उफाळून आल्याचे दिसून आले. घराणेशाही गाडली तरच पुरोगामीत्व टिकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरक्षण हा विकासाचा मुद्या नाही. आरक्षण मागणे हा लोकशाहीचा एक भाग असला, तरी हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे आपण मानतो. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या ङ्म्रीमंत मराठय़ांबाबत गरीब मराठय़ांनी विचार केला पाहिजे, की हे लोक आपले विडंबन तर करीत नाहीत ना. हे विडंबन गरीब मराठय़ांनीच थांबविले पाहिजे. मराठा मूक मोर्चासंदर्भात शासन ठोस भूमिका घेत असल्याचे दिसून येत नाही. या सरकारचा कारभार कुठे चाललाय? हा देखील मोठ प्रश्न आहे. या सरकारचं काय चाललयं, हे फक्त संघ आणि सरकार या दोहोंनाच ठाऊक असल्याची पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.