शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मराठा व ओबीसीमधील वाढती दरी गंभीर!

By admin | Updated: October 24, 2016 02:48 IST

सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

चिखली, दि. २३- मराठा आणि दलित यांचे व्यावहारिक संबंध परंपरागत आहेत. यांच्यातील भांडण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. हे भांडण महिनाभर अधिक वर्षभरा पुरते असते. तद्नंतर त्यांच्यात परस्परांवर अवलंबून असल्याने सलोखा निर्माण होतो; परंतु मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने निर्माण होत असलेली दरी मोठी आहे. त्याचबरोबर गंभीरदेखील. या दरीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून गैरविश्‍वास वाढीस लागला आहे. याला सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसेनजित पाटील, अशोकराव सोनुने, शरद वसतकार, अँड.राहुल धुरंधर, विनोद कळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अँट्रॉसिटी कायद्यासंदर्भात बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले, की अँट्रॉसिटीचा दुरुपयोग मराठय़ांकडूनच होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. याचा बोध घेऊन मराठय़ांनी त्याचा गैरवापर थांबविणे गरजेचे आहे. यासोबतच मराठा आणि मुस्लीम या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरजच नाही. या दोन्ही समाजाच्या समस्या वेगळय़ा आहेत. मुस्लिमांनी आपल्याला शिक्षण कुठल्या माध्यमातून घ्यायचे, उर्दू, मराठी, इंग्रजी की मदरशातून की शाळा, कॉलेजातून हे अगोदर ठरविले पाहिजे. जर मदरशातून घ्यायचे असेल तर त्यांना आरक्षण देऊन उ पयोग काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा समाजातील घरणेशाही सं पुष्टात आणून सर्वसामान्य गरीब मराठय़ांच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने त्या घराणेशाहीच्या विरोधातील असंतोषदेखील उफाळून आल्याचे दिसून आले. घराणेशाही गाडली तरच पुरोगामीत्व टिकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरक्षण हा विकासाचा मुद्या नाही. आरक्षण मागणे हा लोकशाहीचा एक भाग असला, तरी हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे आपण मानतो. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या ङ्म्रीमंत मराठय़ांबाबत गरीब मराठय़ांनी विचार केला पाहिजे, की हे लोक आपले विडंबन तर करीत नाहीत ना. हे विडंबन गरीब मराठय़ांनीच थांबविले पाहिजे. मराठा मूक मोर्चासंदर्भात शासन ठोस भूमिका घेत असल्याचे दिसून येत नाही. या सरकारचा कारभार कुठे चाललाय? हा देखील मोठ प्रश्न आहे. या सरकारचं काय चाललयं, हे फक्त संघ आणि सरकार या दोहोंनाच ठाऊक असल्याची पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.