शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

खात्यातील पैसे सांभाळा, ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : कमी श्रमात व बसल्या जागी पैसे कमावण्यासाठी अनेक गुन्हेगार आता मोबाईल, इंटरनेट याचा वापर ...

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : कमी श्रमात व बसल्या जागी पैसे कमावण्यासाठी अनेक गुन्हेगार आता मोबाईल, इंटरनेट याचा वापर करु लागले आहेत. इंटरनेटमुळे एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. ओटीपी

किंवा आधारकार्ड क्रमांक विचारुन बँकेतून पैसे परस्पर वळविण्याच्या या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यात काेराेना काळात ४१

गुन्हे दाखल झाले आहेत.

केवायसीच्या नावाने कॉल करुन गोपनीय माहिती विचारली जात असून त्यामुळे क्षणात बँक खात्यातील पैसा वळविला जात आहे. जिल्ह्यात सायबर पोलिसांकडे वेगवेगळ्या फसवणुकीबाबत २०१८ ते २०२१ (ऑगस्टपर्यंत) ४१ गुन्हे दाखल

झालेले आहेत. त्यातील ३७ गुन्हे निकाली काढण्यात आले असून ४ गुन्हे प्रलंबित आहेत. केवायसीसाठी आपल्या मोबाईलवर कुणी लिंक पाठविली असल्यास मोहात पडू नका, याद्वारे खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. सायबर गुन्हेगार कॉल किंवा

एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.

तक्रारी काढल्या निकाली

पोलीस दलाच्या सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आता जिल्ह्यात सायबर सेलकडे माैखिक व नव्याने आलेल्या तक्रारी शिल्लक आहेत. बहुतांश प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहेत. सायबर पोलिसांकडे सर्वाधिक तक्रारी या ऑनलाईन फ्रॉडच्या आलेल्या आहेत. त्यातील आरोपी हे खास करुन झारखंड, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील असल्याचे आढळून आलेले आहेत.

सायबर क्राइम वाढताेय

२०१६ २९

२०१७ ४३

२०१८ ४४

२०१९ ४२

२०२० ४१