शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालपुरा हत्याकांडातील आरोपींनी दिली हत्येची कबुली

By admin | Updated: July 1, 2015 01:42 IST

शेतीसाठी संपविले होते चौघांना; विळा व रामपुरी चाकूचा केला होता वापर.

तेल्हारा (अकोला): मालपुरा येथे रविवारी एका पोलिस शिपायासह चौघांची हत्या करणार्‍या आरोपींना पोलिसांनी बोलते केले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर सोमवारी कथन केला. हत्याकांडासाठी वापरण्यात आलेला ऑटोरिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे. मालपुरा येथे रविवार २८ जून रोजी शेतीच्या हिश्शासाठी बाबुराव चराटे (६0), धनराज चराटे (५५) शुभम धनराज चराटे (२२) व गौरव धनराज चराटे या चौघांची द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (४५), हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५0), श्याम हरिभाऊ तेलगोटे (२१) व हरिभाऊचा लहान मुलगा (१७) या चौघांनी विळा व रामपुरी चाकूने गळा चिरून हत्या केल्याची कबुली पोलीस कस्टडीमध्ये असणार्‍या द्वारकाबाई तेलगोटे व श्याम तेलगोटे या आरोपींनी दिली. ह्यशेतीचा हिस्सा देत नसल्याने त्यांना संपविले. या घटनेचे आम्हाला कुठलेही दु:ख नाही व पश्‍चात्तापही नाही,ह्ण असे त्यांनी तपासात सांगितले. घटनेच्या दिवशी आकोटच्या सिद्धार्थनगरातील आंबोळी वेस भागातील प्रशांत बळीराम तेलगोटे याच्या मालकीचा एमएच ३0 एएफ ८९६0 क्रमांकाचा ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन सदर आरोपी मालपुरा येथे आले. त्यावेळेस शुभम धनराज चर्‍हाटे हा गावातील एका ओट्यावर बसलेला आरोपींना दिसताच त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीतील विळा व रामपुरी काढून शुभमवर वार करून त्याला संपविले. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळविला असता त्यांना धनराज चर्‍हाटे व त्यांचा दुसरा मुलगा गौरव दिसून आला. आरोपींनी क्षणाचाही विलंब न करता जवळच्या शस्त्राने धनराजवर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच गौरवलासुद्धा आरोपींनी संपविले. यानंतर आरोपींना बाबुराव चर्‍हाटे दिसून आले. डोक्यात सैतान शिरलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार केला. यावेळी त्यांनी जीव वाचविण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांचाही जीव घेतला. सदर घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले. या घटनेत वापरलेला ऑटोरिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी हरिभाऊ राजाराम तेलगोटेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेतील आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत असून, त्यांच्या बयानात कुठे तफावत आहे काय किंवा ते दिशाभूल करीत आहेत काय, याचा उलगडा करीत पोलीस पुढील तपास करीत आहेत.