शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

हिवतापमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल!

By admin | Updated: April 25, 2017 01:15 IST

आज जागतिक हिवताप दिन : तीन वर्षांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

अतुल जयस्वाल - अकोलामनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बऱ्याच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट झाली आहे.हिवतापाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. विशेषत: आफ्रिका खंडात या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थिम ‘ए पूश फॉर प्रिव्हेंशन’ ही आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडीयम ओव्हेल यांचा समावेश आहे. यापैकी प्लास्मोडीयम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. गत तीन वर्षांत हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. वर्ष २०१५ मध्ये हिवतापाचे १७९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये केवळ ९२ रुग्ण आढळून आले, तर यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ नऊ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवताप मुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्यराज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना हिवतापमुक्त होण्यासाठी ठरावीक वर्षापर्यंतचे लक्ष्य दिले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील गत तीन वर्षांमधील रुग्णांची संख्या बघू जाता जिल्ह्यासाठी २०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यात यश येणार असल्याचे दिसते.हिवताप हा आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हिवतापाच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. - डॉ. अभिनव भुते, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला.