शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

हिवतापमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल!

By admin | Updated: April 25, 2017 01:15 IST

आज जागतिक हिवताप दिन : तीन वर्षांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

अतुल जयस्वाल - अकोलामनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बऱ्याच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट झाली आहे.हिवतापाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. विशेषत: आफ्रिका खंडात या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थिम ‘ए पूश फॉर प्रिव्हेंशन’ ही आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडीयम ओव्हेल यांचा समावेश आहे. यापैकी प्लास्मोडीयम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडीयम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. गत तीन वर्षांत हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. वर्ष २०१५ मध्ये हिवतापाचे १७९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये केवळ ९२ रुग्ण आढळून आले, तर यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ नऊ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवताप मुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. २०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्यराज्य शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना हिवतापमुक्त होण्यासाठी ठरावीक वर्षापर्यंतचे लक्ष्य दिले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील गत तीन वर्षांमधील रुग्णांची संख्या बघू जाता जिल्ह्यासाठी २०२० पर्यंत हिवतापमुक्तीचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यात यश येणार असल्याचे दिसते.हिवताप हा आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी डासांची उत्पत्ती होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हिवतापाच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. - डॉ. अभिनव भुते, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला.