शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

पक्षनिष्ठा आणि संपर्काचा अभाव आघाडीच्या मुळावर!

By admin | Updated: December 31, 2015 02:41 IST

मतदारांमध्ये नाराजी, काँग्रेस राहिली अलिप्त.

विवेक चांदूरकर/वाशिम : मतदार सदस्यांमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव आणि उमेदवाराकडून योग्य संपर्क नसल्याने विधान परिषद निवडणुकीत आघाडीला पराभव पत्करावा लागला. वाशिम जिल्ह्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भाजप - सेनेपेक्षा जास्त असतानाही युतीच्या उमेदवाराला झालेले मतदान आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं निर्माण करणारे आहे.वाशिम जिल्हा परिषद ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, त्यामध्ये काँग्रेस - १७, राष्ट्रवादी - ८, शिवसेना - ८, भाजपा - ६, मनसे - ४, भारिप - ३, अपक्ष - ६, असे संख्याबळ आहे. ५२ पैकी २५ मतदार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, वाशिम जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांची सदस्य संख्या ९१ आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषद काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. कारंजात सर्वात जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जास्त असून, या मतदारांनी पक्षाशी निष्ठा ठेवून मतदान केले असते तर सपकाळ यांना सर्वात जास्त मतदान झाले असते; मात्र सेनेचे विजयी उमेदवार गोपीकिसन बाजोरियांचा जनसंपर्क पक्षनिष्ठेपेक्षाही प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. सेना-भाजप युतीचे गोपीकिसन बाजोरिया हे अकोल्याचे तर काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सपकाळ हे बुलडाणा येथील रहिवासी आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासून तर मतदान होईपर्यंत बाजोरिया यांनी वारंवार जिल्ह्यात दौरे करून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या. दुसरीकडे सपकाळ यांनी मतदार सदस्यांना बैठकीला बोलाविण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून दिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या सहायकांमार्फत मतदार सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप दिला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक संतप्त झाले. उमेदवाराने स्वत:ने किंवा त्यांच्या स्वीय सहायकाने बैठकीचा निरोप द्यायला हवा होता, त्यांनी संपर्क साधून मतदारांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे होते, असे मत काही सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. याच संधीचा बाजोरिया यांनी फायदा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा त्यांना फायदा झाला. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना डावलले जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे हे नेते नाराज झाले व त्याचा परिणाम निकालावर झाला.