शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पक्षनिष्ठा आणि संपर्काचा अभाव आघाडीच्या मुळावर!

By admin | Updated: December 31, 2015 02:41 IST

मतदारांमध्ये नाराजी, काँग्रेस राहिली अलिप्त.

विवेक चांदूरकर/वाशिम : मतदार सदस्यांमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव आणि उमेदवाराकडून योग्य संपर्क नसल्याने विधान परिषद निवडणुकीत आघाडीला पराभव पत्करावा लागला. वाशिम जिल्ह्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भाजप - सेनेपेक्षा जास्त असतानाही युतीच्या उमेदवाराला झालेले मतदान आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं निर्माण करणारे आहे.वाशिम जिल्हा परिषद ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, त्यामध्ये काँग्रेस - १७, राष्ट्रवादी - ८, शिवसेना - ८, भाजपा - ६, मनसे - ४, भारिप - ३, अपक्ष - ६, असे संख्याबळ आहे. ५२ पैकी २५ मतदार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, वाशिम जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांची सदस्य संख्या ९१ आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषद काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. कारंजात सर्वात जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जास्त असून, या मतदारांनी पक्षाशी निष्ठा ठेवून मतदान केले असते तर सपकाळ यांना सर्वात जास्त मतदान झाले असते; मात्र सेनेचे विजयी उमेदवार गोपीकिसन बाजोरियांचा जनसंपर्क पक्षनिष्ठेपेक्षाही प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. सेना-भाजप युतीचे गोपीकिसन बाजोरिया हे अकोल्याचे तर काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सपकाळ हे बुलडाणा येथील रहिवासी आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासून तर मतदान होईपर्यंत बाजोरिया यांनी वारंवार जिल्ह्यात दौरे करून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या. दुसरीकडे सपकाळ यांनी मतदार सदस्यांना बैठकीला बोलाविण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून दिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या सहायकांमार्फत मतदार सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप दिला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक संतप्त झाले. उमेदवाराने स्वत:ने किंवा त्यांच्या स्वीय सहायकाने बैठकीचा निरोप द्यायला हवा होता, त्यांनी संपर्क साधून मतदारांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे होते, असे मत काही सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. याच संधीचा बाजोरिया यांनी फायदा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा त्यांना फायदा झाला. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना डावलले जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे हे नेते नाराज झाले व त्याचा परिणाम निकालावर झाला.