शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

पक्षनिष्ठा आणि संपर्काचा अभाव आघाडीच्या मुळावर!

By admin | Updated: December 31, 2015 02:41 IST

मतदारांमध्ये नाराजी, काँग्रेस राहिली अलिप्त.

विवेक चांदूरकर/वाशिम : मतदार सदस्यांमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव आणि उमेदवाराकडून योग्य संपर्क नसल्याने विधान परिषद निवडणुकीत आघाडीला पराभव पत्करावा लागला. वाशिम जिल्ह्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भाजप - सेनेपेक्षा जास्त असतानाही युतीच्या उमेदवाराला झालेले मतदान आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं निर्माण करणारे आहे.वाशिम जिल्हा परिषद ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, त्यामध्ये काँग्रेस - १७, राष्ट्रवादी - ८, शिवसेना - ८, भाजपा - ६, मनसे - ४, भारिप - ३, अपक्ष - ६, असे संख्याबळ आहे. ५२ पैकी २५ मतदार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, वाशिम जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांची सदस्य संख्या ९१ आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषद काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. कारंजात सर्वात जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जास्त असून, या मतदारांनी पक्षाशी निष्ठा ठेवून मतदान केले असते तर सपकाळ यांना सर्वात जास्त मतदान झाले असते; मात्र सेनेचे विजयी उमेदवार गोपीकिसन बाजोरियांचा जनसंपर्क पक्षनिष्ठेपेक्षाही प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. सेना-भाजप युतीचे गोपीकिसन बाजोरिया हे अकोल्याचे तर काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सपकाळ हे बुलडाणा येथील रहिवासी आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासून तर मतदान होईपर्यंत बाजोरिया यांनी वारंवार जिल्ह्यात दौरे करून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या. दुसरीकडे सपकाळ यांनी मतदार सदस्यांना बैठकीला बोलाविण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून दिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या सहायकांमार्फत मतदार सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप दिला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक संतप्त झाले. उमेदवाराने स्वत:ने किंवा त्यांच्या स्वीय सहायकाने बैठकीचा निरोप द्यायला हवा होता, त्यांनी संपर्क साधून मतदारांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे होते, असे मत काही सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. याच संधीचा बाजोरिया यांनी फायदा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा त्यांना फायदा झाला. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना डावलले जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे हे नेते नाराज झाले व त्याचा परिणाम निकालावर झाला.