शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पातूर तालुक्यातील ९९ गावांचा भार ११ कृषी सहायकांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

संतोषकुमार गवई पातूर: शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कृषी सहायकांवर असते. तालुका ...

संतोषकुमार गवई

पातूर: शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कृषी सहायकांवर असते. तालुका कृषी कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील ९९ गावांचा भार हा केवळ ११ कृषी सहायकांच्या खांद्यावर आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, शेतकऱ्यांनाही वेळेवर योजनेचा लाभ देण्यासाठी कसरत होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात २६ हजार १४४ खातेदारांची संख्या आहे; मात्र शासनाच्या शेती विषयक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी केवळ ११ कृषी सहायक कार्यरत आहेत. उर्वरित सर्व पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी तथा जीवनमान बदलविण्यासाठी वेळोवेळी विविध योजना राबविते. शासन आणि शेतकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा कृषी सहायक पदावर काम करणारा कर्मचारी आहे. शेकडो खातेदारांना एकाच वेळी विविध योजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर असते. पातूर तालुक्यात कृषी सहायकांची अनेक पदे रिक्त असल्याने योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न कृषी सहायकांना पडला आहे.

-------------------------------------

एका कृषी सहायकावर १४ गावांचा अतिरिक्त पदभार

सध्या तालुक्यातील कृषी सहायकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे ९९ गावांची जबाबदारी केवळ ११ कृषी सहायकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे एका कृषी सहाय्यकाकडे १३ ते १४ गावांचा अतिरिक्त प्रभार आहे. शिर्ला येथे पातूर तालुका कृषी कार्यालय स्थित आहे. या कार्यालयात तीन शिपाई पदांसह अनेक पदे रिक्त आहेत.

----------------------

चारचाकी वाहनही नाही!

तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांसाठी चार चाकी वाहन उपलब्ध नाही, त्यामुळे शिवार भेटी करण्यास तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

-----------------------

कृषी सहायकांची तथा कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या अत्यावश्यक आहे.

- डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.

------------

एकाच वेळी अनेक गावांचा कृषी सहायकाकडे अतिरिक्त प्रभार असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास विलंब लागतो आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पदे भरावी.

-अनिल सुरवाडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना.