शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पातूर तालुक्यातील ९९ गावांचा भार ११ कृषी सहायकांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:23 IST

संतोषकुमार गवई पातूर: शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कृषी सहायकांवर असते. तालुका ...

संतोषकुमार गवई

पातूर: शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कृषी सहायकांवर असते. तालुका कृषी कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील ९९ गावांचा भार हा केवळ ११ कृषी सहायकांच्या खांद्यावर आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, शेतकऱ्यांनाही वेळेवर योजनेचा लाभ देण्यासाठी कसरत होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात २६ हजार १४४ खातेदारांची संख्या आहे; मात्र शासनाच्या शेती विषयक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी केवळ ११ कृषी सहायक कार्यरत आहेत. उर्वरित सर्व पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी तथा जीवनमान बदलविण्यासाठी वेळोवेळी विविध योजना राबविते. शासन आणि शेतकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा कृषी सहायक पदावर काम करणारा कर्मचारी आहे. शेकडो खातेदारांना एकाच वेळी विविध योजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर असते. पातूर तालुक्यात कृषी सहायकांची अनेक पदे रिक्त असल्याने योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न कृषी सहायकांना पडला आहे.

-------------------------------------

एका कृषी सहायकावर १४ गावांचा अतिरिक्त पदभार

सध्या तालुक्यातील कृषी सहायकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे ९९ गावांची जबाबदारी केवळ ११ कृषी सहायकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे एका कृषी सहाय्यकाकडे १३ ते १४ गावांचा अतिरिक्त प्रभार आहे. शिर्ला येथे पातूर तालुका कृषी कार्यालय स्थित आहे. या कार्यालयात तीन शिपाई पदांसह अनेक पदे रिक्त आहेत.

----------------------

चारचाकी वाहनही नाही!

तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकाऱ्यांसाठी चार चाकी वाहन उपलब्ध नाही, त्यामुळे शिवार भेटी करण्यास तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

-----------------------

कृषी सहायकांची तथा कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या अत्यावश्यक आहे.

- डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर.

------------

एकाच वेळी अनेक गावांचा कृषी सहायकाकडे अतिरिक्त प्रभार असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास विलंब लागतो आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पदे भरावी.

-अनिल सुरवाडे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना.