शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सहा आरोपींना जन्मठेप

By admin | Updated: December 2, 2015 03:15 IST

अकोला जिल्ह्यातील नेव्होरी हत्याकांड; दुस-या गुन्ह्यातील आरोपींची सुटका.

आकोट (अकोला): आकोट तालुक्यातील नेव्होरी येथे गणपती विसर्जन वादातून १७ वर्षांंंपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील सहा आरोपींना मंगळवारी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आकोट तालुक्यातील ग्राम नेव्होरी येथे ३ सप्टेंबर १९९८ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील इंगळे आणि मामनकर यांच्यात वाद झाला होता. मिरवणुकीमध्ये मुकुंद प्रल्हाद मामनकर हा दोन्ही बाजूला पेटलेली मशाल फिरवत होता. पांडुरंग चंद्रभान इंगळे यांनी त्यांचे घर कुडाचे असल्याने मशाल फिरविण्यावर आक्षेप घेतला; मात्र त्याने मशाल फिरविणे सुरूच ठेवले आणि त्यामुळे साहेबराव इंगळे यांच्या घरावरील कुडाने पेट घेतला. यातून त्यांच्यात वाद झाला आणि काही वेळाने मामनकर यांच्या गटाने इंगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला केला. हल्ल्यात पांडुरंग चंद्रभान इंगळे, दामोदर चंद्रभान इंगळे, गणेश पांडुरंग इंगळे हे जखमी झाले. त्यापैकी पांडुरंग चंद्रभान इंगळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गोविंद अण्णा इंगळे यांच्या फिर्यादीवरून आकोट पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३0२ (खून करणे), ३0७ (प्राणघातक हल्ला) १४७, १४८, १४९, १३५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीची सात वर्षे या प्रकरणी अकोला येथील न्यायालयात सुनावणी झाली. आकोट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यानंतर हा खटला तेथे वर्ग करण्यात आला. आकोट येथे आणखी १0 वर्षे सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे चार प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकार्‍याची साक्ष नोंदविण्यात आली. ती ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अँड. प्रवीण चिंचोले आणि अँड. जयकृष्ण गावंडे यांनी काम पाहिले. अँड. सुभाष काटे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींतर्फे अँड. मोहन मोयल यांनी काम पाहिले. पुंडलिक गुणवंत मामनकर, शेषराव पुंडलिक वसू, राजेंद्र प्रल्हाद मामनकर, श्रीकृष्ण रामराव मामनकर, गोपाळ रामराव मामनकर, मुकुंद प्रल्हाद मामनकर यांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असून, दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये मृतकाच्या वारसांना, तर जखमींना प्रत्येकी २0 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ११ जणांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.