शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सहा आरोपींना जन्मठेप

By admin | Updated: December 2, 2015 03:15 IST

अकोला जिल्ह्यातील नेव्होरी हत्याकांड; दुस-या गुन्ह्यातील आरोपींची सुटका.

आकोट (अकोला): आकोट तालुक्यातील नेव्होरी येथे गणपती विसर्जन वादातून १७ वर्षांंंपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील सहा आरोपींना मंगळवारी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आकोट तालुक्यातील ग्राम नेव्होरी येथे ३ सप्टेंबर १९९८ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील इंगळे आणि मामनकर यांच्यात वाद झाला होता. मिरवणुकीमध्ये मुकुंद प्रल्हाद मामनकर हा दोन्ही बाजूला पेटलेली मशाल फिरवत होता. पांडुरंग चंद्रभान इंगळे यांनी त्यांचे घर कुडाचे असल्याने मशाल फिरविण्यावर आक्षेप घेतला; मात्र त्याने मशाल फिरविणे सुरूच ठेवले आणि त्यामुळे साहेबराव इंगळे यांच्या घरावरील कुडाने पेट घेतला. यातून त्यांच्यात वाद झाला आणि काही वेळाने मामनकर यांच्या गटाने इंगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला केला. हल्ल्यात पांडुरंग चंद्रभान इंगळे, दामोदर चंद्रभान इंगळे, गणेश पांडुरंग इंगळे हे जखमी झाले. त्यापैकी पांडुरंग चंद्रभान इंगळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गोविंद अण्णा इंगळे यांच्या फिर्यादीवरून आकोट पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३0२ (खून करणे), ३0७ (प्राणघातक हल्ला) १४७, १४८, १४९, १३५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीची सात वर्षे या प्रकरणी अकोला येथील न्यायालयात सुनावणी झाली. आकोट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यानंतर हा खटला तेथे वर्ग करण्यात आला. आकोट येथे आणखी १0 वर्षे सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे चार प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकार्‍याची साक्ष नोंदविण्यात आली. ती ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अँड. प्रवीण चिंचोले आणि अँड. जयकृष्ण गावंडे यांनी काम पाहिले. अँड. सुभाष काटे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींतर्फे अँड. मोहन मोयल यांनी काम पाहिले. पुंडलिक गुणवंत मामनकर, शेषराव पुंडलिक वसू, राजेंद्र प्रल्हाद मामनकर, श्रीकृष्ण रामराव मामनकर, गोपाळ रामराव मामनकर, मुकुंद प्रल्हाद मामनकर यांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असून, दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये मृतकाच्या वारसांना, तर जखमींना प्रत्येकी २0 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ११ जणांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.