शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर

By admin | Updated: January 6, 2017 02:46 IST

कर्जाची वसुली; शेतमाल विक्रीची जमा रक्कम देण्यावर बँकाचे निर्बंध.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ५- तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन न केलेल्या शेतकर्‍यांना चालू वर्षात बँकांनी पीक कर्ज तर दिलेच नाही. आता कॅशलेस व्यवहारामुळे त्या थकीत शेतकर्‍यांना शेतमालाची रक्कम धनादेशाने दिली जात आहे. जमा होणारी रक्कम खात्यातून काढण्यास बँकांनी निर्बंध लावल्याने हजारो शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. हा प्रकार घडलेल्या गांधीग्राम येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत धाव घेतलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, अशी तंबीच देण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत.ैगेल्या २00९ पासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे २0१६ पर्यंतच्या सर्वच हंगामात शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या रकमेची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यांना नव्याने कर्ज देण्यात आले; मात्र त्यावेळी काही शेतकर्‍यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नवीन कर्जही घेतले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी २0१४-१५ पर्यंत थकीत झाले. चालू वर्षात २0१६-१७ च्या खरीप, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यामध्ये दरवर्षी कर्ज घेतले; पण ते थकीत असलेल्या शेतकर्‍यांनाच पुनर्गठनाचा लाभ देण्यात आला. ज्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. आधीच्या वर्षी घेतलेले कर्ज दुसर्‍या वर्षी थकीत ठेवले, त्यांना चालू वर्षातही बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे अकोला जिल्हय़ातच हजारो शेतकरी वंचित राहिले. आता शेतमालाची रक्कम मिळणेही कठीणशेतकर्‍यांची एकदा घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने ती वसूल करण्याची कारवाई बँकांनी सुरू केली आहे. त्यातच आता कॅशलेस व्यवहार असल्याने शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारेच दिली जात आहे. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर शेतकर्‍यांना ती काढता येत नाही. त्यावर बँकांनी निर्बंध लावले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना तुम्ही काहीही करा, थकीत कर्ज भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशी तंबी बँकेचे अधिकारी देत आहेत. शासनाचा रिझर्व्ह बँकेकडे प्रस्तावराज्यभरात लाखो शेतकरी या तांत्रिक मुद्यामुळे पीक कर्जापासून वंचित होते. त्यावर शासनाने रिझर्व्ह बँकेकडे या शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती; मात्र त्यावर काहीच निर्देश न मिळाल्याने शेतकरी वंचितच आहे.गांधीग्राम येथे घडला प्रकारशेतकर्‍यांनी कापसाच्या विक्रीतून मिळालेला धनादेश बँकेत जमा केला. त्याची रक्कमही बँकेत जमा झाली. ती काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असे शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांनी सांगितले. एटीएम कार्डचा वापर करूनही ती निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता बिथरले आहेत. पाच शेतकर्‍यांसोबत हा प्रकार घडला आहे.