शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर

By admin | Updated: January 6, 2017 02:46 IST

कर्जाची वसुली; शेतमाल विक्रीची जमा रक्कम देण्यावर बँकाचे निर्बंध.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ५- तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन न केलेल्या शेतकर्‍यांना चालू वर्षात बँकांनी पीक कर्ज तर दिलेच नाही. आता कॅशलेस व्यवहारामुळे त्या थकीत शेतकर्‍यांना शेतमालाची रक्कम धनादेशाने दिली जात आहे. जमा होणारी रक्कम खात्यातून काढण्यास बँकांनी निर्बंध लावल्याने हजारो शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. हा प्रकार घडलेल्या गांधीग्राम येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत धाव घेतलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, अशी तंबीच देण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत.ैगेल्या २00९ पासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे २0१६ पर्यंतच्या सर्वच हंगामात शेतकर्‍यांना पीक कर्जाच्या रकमेची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यांना नव्याने कर्ज देण्यात आले; मात्र त्यावेळी काही शेतकर्‍यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नवीन कर्जही घेतले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी २0१४-१५ पर्यंत थकीत झाले. चालू वर्षात २0१६-१७ च्या खरीप, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यामध्ये दरवर्षी कर्ज घेतले; पण ते थकीत असलेल्या शेतकर्‍यांनाच पुनर्गठनाचा लाभ देण्यात आला. ज्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. आधीच्या वर्षी घेतलेले कर्ज दुसर्‍या वर्षी थकीत ठेवले, त्यांना चालू वर्षातही बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे अकोला जिल्हय़ातच हजारो शेतकरी वंचित राहिले. आता शेतमालाची रक्कम मिळणेही कठीणशेतकर्‍यांची एकदा घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने ती वसूल करण्याची कारवाई बँकांनी सुरू केली आहे. त्यातच आता कॅशलेस व्यवहार असल्याने शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारेच दिली जात आहे. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर शेतकर्‍यांना ती काढता येत नाही. त्यावर बँकांनी निर्बंध लावले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना तुम्ही काहीही करा, थकीत कर्ज भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशी तंबी बँकेचे अधिकारी देत आहेत. शासनाचा रिझर्व्ह बँकेकडे प्रस्तावराज्यभरात लाखो शेतकरी या तांत्रिक मुद्यामुळे पीक कर्जापासून वंचित होते. त्यावर शासनाने रिझर्व्ह बँकेकडे या शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती; मात्र त्यावर काहीच निर्देश न मिळाल्याने शेतकरी वंचितच आहे.गांधीग्राम येथे घडला प्रकारशेतकर्‍यांनी कापसाच्या विक्रीतून मिळालेला धनादेश बँकेत जमा केला. त्याची रक्कमही बँकेत जमा झाली. ती काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकर्‍यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असे शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांनी सांगितले. एटीएम कार्डचा वापर करूनही ती निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता बिथरले आहेत. पाच शेतकर्‍यांसोबत हा प्रकार घडला आहे.