शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पीकविम्याकडे शेतकर्‍यांची पाठ

By admin | Updated: August 19, 2014 00:16 IST

गतवर्षी १.६0 लाख विमाधारक शेतकरी : यावर्षी केवळ ६९ हजार शेतकर्‍यांचा विमा

वाशिम: २0१३-१४ च्या खरीप पीक विमा योजनेंतर्गत अपेक्षीत नुकसानभरपाई पदरी न पडल्याच्या धक्क्यातून जिल्ह्यातील शेतकरी अजूनही सावरला नसल्याची बाब समोर येत आहे. गतवर्षी १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी विमा उतरविला होता. यावर्षी मात्र केवळ ६९ हजार शेतकर्‍यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. कृषीप्रधान देशातील शेतकरी चोहोबाजूंनी येणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटांनी खचून जात आहे. नैसर्गिक व मानवी संकटांच्या मालिकेतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्‍यांचा उद्योजक व व्यापार्‍यांकडूनदेखील 'हिरमोड' होत असतो. नैसर्गिक आपत्तीत सापडणार्‍या पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली आहे. गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ६८९ शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. यापैकी केवळ ५१ हजार ४९0 शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या यादीत स्थान मिळाले होते. अतवृष्टी आणि गारपीटीने रिसोड तालुक्यातील शेतकर्‍यांना अक्षरश: झोडपले होते. मात्र, मूग पिकाचा अपवाद वगळता उर्वरीत कोणत्याच पिकाचा विमा शेतकर्‍यांना मिळाला नाही. गतवर्षीचा अनुभव आणि यावर्षीचे कोरड्या दुष्काळाचे संकट बघून सुरूवातीपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली होती. कृषी विभागाने जनजागृती करून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ३१ जुलैची अंतिम मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविली. मात्र, शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात विमा कंपनी व कृषी विभागाला अपेक्षीत यश न आल्याने विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची संख्या यावर्षी जवळपास ९0 हजाराने घटली. विमा कंपनीच्या जाचक अटी, गतवर्षीच्या अतवृष्टीनंतरही विमा योजनेचा लाभ न मिळणे आणि यावर्षीची दुष्काळसदृश्य स्थिती या वास्तवतेच्या ओझ्याखाली पीक विमा योजनेची जनजागृती मोहिम अक्षरश: दबून गेली. १६ ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील केवळ ६९ हजार शेतकर्‍यांनी खरीप पीक विमा काढला आहे.