शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

प्रशासनातल्या लेकींनी केले सावित्रीमाईंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, डॉ. स्वप्ना लांडे, डॉ. मीना शिवाल, श्रीमती ...

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, डॉ. स्वप्ना लांडे, डॉ. मीना शिवाल, श्रीमती नीता खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी मान्यवर तसेच जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत स्वप्ना लांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनी स्वतःमध्ये बुद्धिप्रामाण्यवादाचा विकास करावा. स्वतःसोबत समाजाला जागरूक करून महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. स्वप्ना लांडे म्हणाल्या की, परंपरा किंवा कुणी तरी सांगते ते सत्य मानू नका. आपल्या बुद्धीला पटत असेल, ते आपल्या हिताचे आणि समाजाच्या हिताचे असेल त्याचाच स्वीकार करा. महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्रास सहन केला. त्यांच्या या त्यागामुळेच आजची स्त्री अंतराळातसुद्धा जाऊ शकली. पण शिक्षण मिळाले तरी स्त्री ज्ञानी झाली असे नव्हे. आजही शिकलेल्या स्त्रियासुद्धा विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून अंधश्रद्धांचा बळी ठरल्या आहेत. नेहमीच सोशिक त्रास सहन करणारी स्त्री ही चांगली अशी समाजाची धारणा राहिलेली आहे. त्यासाठी स्त्रियांनी आपल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन जगणे अधिकाधिक सहज सोप करावे, हे जीवन परस्परपूरक सहजीवन असावे. असेच सहजीवन हे महात्मा फुले व सावित्रीबाईंचे होते, असे डॉ. लांडे म्हणाल्या. आपल्या व्याख्यानात त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रेरक प्रसंगांचे दाखलेही उपस्थितांना दिले.

या कार्यक्रमात नायब तहसीलदार स्नेहा गिरिगोसावी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना शिवाल, कविता बडगे, शीतल शर्मा यांनीही आपले विचार मांडले. प्रत्येकीने सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा गौरव करून स्त्रियांनी त्यांच्या विचार आणि कर्तृत्वाचा वारसा चालवावा, असे आवाहन केले.

  निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी यानिमित्त संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला या सामाजिक संस्थेच्या वतीने सुरू होत असलेल्या महिला सक्षमीकरण सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. येत्या १२ जानेवारीपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

  कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अधीक्षक मीरा पागोर यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी काळे यांनी केले.