शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आठ शहरांमध्ये लागणार एलईडी पथदिवे!

By admin | Updated: October 22, 2016 02:41 IST

केंद्र शासनाकडून कंपनीची नियुक्ती.

आशिष गावंडेअकोला, दि. २१- महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केंद्र शासनाने ह्यईईएसएलह्ण कंपनीला दिले आहे. कंपनीच्या माध्यमातून एलईडी लावण्याचे निर्देश राज्यातील आठ महापालिकांना प्राप्त झाले आहेत. वीज बचत करण्याच्या उद्देशातून सीएफएल पथदिव्यांना बाजूला सारत लख्ख उजेड देणार्‍या एलईडी पथदिव्यांना प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. राज्यातील आठ महापालिकांमध्ये केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ह्यईईएसएलह्ण कंपनीमार्फत एलईडी पथदिवे उभारण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. कंपनीने पथदिवे लावल्यानंतर सात वर्षांंपर्यंंत त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची अट नमूद आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित कंपनीला दिल्यास महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, असे मानल्या जात आहे. दहा वर्षांंंपूर्वी बहुतांश मनपा क्षेत्रात सोडियम पथदिव्यांचा वापर केला जात असे. त्या बदल्यात महापालिकांना अतिरिक्त वीज देयकाचा भुर्दंंड सहन कराव लागत होता. त्याला पर्याय म्हणून सीएफएल पथदिव्यांचा वापर करण्यात आला. सीएफएलमुळे लख्ख उजेड पडत नसल्याने नागरिकांना अंधूक उजेडाचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानिमित्ताने एलईडीचा पर्याय समोर आला आहे. प्रकाशमान असणार्‍या एलईडी पथदिव्यांसाठी वीज कमी लागत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असून, मनपा क्षेत्रामध्ये एलईडी पथदिवे लावण्यासाठी ह्यईईएसएलह्ण कंपनीची नियुक्ती केली. आठ महापालिकांना निर्देशअकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, मीरा-भाईंदर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार या महापालिका क्षेत्रात एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे लावण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार महापालिकांनी प्रक्रिया सुरू केली आहे.२0 कोटींचे लागणार पथदिवेएलईडी पथदिव्यांसाठी स्थानिक आमदारांना शासनाने १0 कोटींची रक्कम मंजूर केल्यानंतर उर्वरित दहा कोटींचा हिस्सा मनपाने जमा करण्याची अट आहे. मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून उर्वरित दहा कोटींची रक्कम जमा केली असून, एकूण २0 कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख रस्ते व प्रमुख चौकांमध्ये प्रकाशमान एलईडी पथदिवे उभारल्या जातील.