शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २७ वर्षांपासून मोबदला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:19 IST

एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी कुबराबी जो. गुलाम नबी यांच्या मालकीची पातूर शेत सर्व्हे नंबर २७१/ २७२ /२७३ मधील ४० आर्मी ...

एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी कुबराबी जो. गुलाम नबी यांच्या मालकीची पातूर शेत सर्व्हे नंबर २७१/ २७२ /२७३ मधील ४० आर्मी सेमी १९९३ पासून संपादित केली आहे. परंतु, तब्बल २७ वर्षे उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना मोबदला भाडे नुकसान भरपाई मिळाली नाही. सदर शेतकरी २७ वर्षांपासून शासनाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, अजूनही शासनाला पाझर फुटला नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जमिनीचा मोबदला न मिळाल्यास जमीन पुन्हा ताब्यात घेऊन रस्ता बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जमीन अधिग्रहित, परंतु उद्योग नाहीत!

तब्बल २७ वर्षांपासून १५.०८ हेक्टर जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर राष्ट्रीय औद्योगिक विकास मंडळाने भूखंड ताब्यात घेऊन तालुक्यातील बेरोजगारी दूर करून मोठे उद्योग उभारणे अपेक्षित होते. परंतु, शासनाच्या व प्रशासनाचा नाकर्तेपणा व उदासीन धोरणामुळे उद्याेग सुरू झाले नाहीत. एमआयडीसीत एकही उद्योग नाही. मुबलक जागा, देऊळगाव पाझर तलावाचे भरपूर पाणी, दळणवळणासाठी राष्ट्रीय महामार्ग, आदी उद्योग, पूरक सुविधा असूनही एमआयडीसीची दुरवस्था झाली आहे.

नवीन भूसंपादन कायदा काय म्हणतो?

१८९४ ला तयार झालेला ब्रिटिशकालीन भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करून अत्यंत पारदर्शी पद्धतीने सर्वव्यापक सर्वसमावेशक असा नवीन भूसंपादन कायदा २०१३ ला अमलात आला. कायद्यातील तरतुदीनुसार बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून अवाॅर्ड अमाउंट त्वरित देण्यात यावी. संपादित केलेल्या जमिनीचा पाच वर्षांत उपयोग न झाल्यास ती जमीन शेतकऱ्याला परत करावी किंवा शासनाच्या लॅंड बँकेमध्ये जमा करावी, असे भूसंपादन कायद्यात म्हटले आहे.

वरिष्ठांशी चर्चा करून विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात येईल.

-राजेश ठाकरे, एरिया मॅनेजर, औद्योगिक विकास महामंडळ

येत्या काही दिवसांत जमिनीचा मोबदला मिळाला नाही तर जमीन ताब्यात घेण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागण्यात येईल.

-कुबरा बी. जो. गुलाम नबी, शेतकरी, पातूर

२७ वर्षांपासून त्यांना मोबदला का मिळाला नाही याबाबत सांगता येणार नाही. परंतु, त्यांना मोबदला मिळावा यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय मुंबई येथे पाठविण्यात आला. लवकरच त्यांचा मोबदला त्यांना मिळेल.

- राजाराम गुठळे, विभागीय अधिकारी, एमआयडीसी अमरावती