शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:15 IST

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले.

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पीक कर्जाचे वाटप अत्यल्प असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत ५० टक्के पीक कर्जाचे वाटप करण्याचा ‘अल्टीमेटम’देखील त्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणिया, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत आतापर्यंत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप यासंदर्भात बँकनिहाय कामाचा आढावा किशोर तिवारी यांनी घेतला. जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आल्याने, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी घेऊनही पूर्ण होत नसल्याच्या मुद्यावर किशोर तिवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्दिष्टाच्या जिल्ह्यात शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, कर्ज वाटपातील बँकांच्या कामगिरीवर तिवारी यांनी चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत किमान ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटमही किशोर तिवारी यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. या आढावा बैठकीला राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने सावकारीला पुरुज्जीवन!बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने, ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा धंदा वाढला असून, त्याद्वारे सावकारीला पुरुज्जीवन मिळत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या बँकांकडून ६ टक्के व्याज दराने पैसे घेतात आणि शेतकरी, शेतमजूर व बचत गटांना २२ ते २४ टक्के व्याजदराने कर्ज वाटप करतात. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशा सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या.कर्ज नाकारल्याने शेतकरी आत्महत्या झाल्यास फौजदारी!कर्जासाठी पात्र असताना बँकेने कर्ज नाकारल्याने, एखाद्या शेतकºयाने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा किशोर तिवारी यांनी या बैठकीत दिला.कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका!कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज तातडीने वाटप करण्याचे सांगत, कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका, असे निर्देश किशोर तिवारी यांनी बँकांना दिले. पात्र शेतकºयांना कर्ज नाकारू नका, असेही त्यांनी सांगितले.प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करा!पीक कर्ज वाटपासंदर्भात तालुका स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून, त्याद्वारे किती प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासंदर्भात विचारणा करीत, शेतकºयांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणांचा अहवाल प्रत्येक आठवड्यात जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे सादर करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी बँकांना दिल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीCrop Loanपीक कर्जbankबँक