शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पीक कर्जाच्या अत्यल्प वाटपावर तिवारींचे बँकांवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:15 IST

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले.

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पीक कर्जाचे वाटप अत्यल्प असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत ५० टक्के पीक कर्जाचे वाटप करण्याचा ‘अल्टीमेटम’देखील त्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणिया, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत आतापर्यंत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप यासंदर्भात बँकनिहाय कामाचा आढावा किशोर तिवारी यांनी घेतला. जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आल्याने, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी घेऊनही पूर्ण होत नसल्याच्या मुद्यावर किशोर तिवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्दिष्टाच्या जिल्ह्यात शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, कर्ज वाटपातील बँकांच्या कामगिरीवर तिवारी यांनी चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत किमान ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटमही किशोर तिवारी यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. या आढावा बैठकीला राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने सावकारीला पुरुज्जीवन!बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने, ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा धंदा वाढला असून, त्याद्वारे सावकारीला पुरुज्जीवन मिळत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या बँकांकडून ६ टक्के व्याज दराने पैसे घेतात आणि शेतकरी, शेतमजूर व बचत गटांना २२ ते २४ टक्के व्याजदराने कर्ज वाटप करतात. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशा सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या.कर्ज नाकारल्याने शेतकरी आत्महत्या झाल्यास फौजदारी!कर्जासाठी पात्र असताना बँकेने कर्ज नाकारल्याने, एखाद्या शेतकºयाने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा किशोर तिवारी यांनी या बैठकीत दिला.कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका!कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज तातडीने वाटप करण्याचे सांगत, कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका, असे निर्देश किशोर तिवारी यांनी बँकांना दिले. पात्र शेतकºयांना कर्ज नाकारू नका, असेही त्यांनी सांगितले.प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करा!पीक कर्ज वाटपासंदर्भात तालुका स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून, त्याद्वारे किती प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासंदर्भात विचारणा करीत, शेतकºयांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणांचा अहवाल प्रत्येक आठवड्यात जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे सादर करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी बँकांना दिल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीCrop Loanपीक कर्जbankबँक