अकाेला : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये तब्बल दाेन हजार ४०० पाेलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त असल्याने, पाेलीस खात्यातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा माेठा ताण वाढला आहे. २०१८ ते २०२० या तीन वर्षांत महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तब्बल दीड हजारावर उमेदवारांची काेराेनामुळे शारीरिक चाचणीच झाली नसल्याने, त्यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आली नसल्याने, हा ताण आणखीनच वाढत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्तपदांची माेठी संख्या आहे. अशाच प्रकारे गृहविभागातही रिक्तपदांचा आकडा वाढत चालला आहे. २०२१ मध्ये तब्ब्ल दाेन हजार ४६६ पीएसआयची पदे रिक्त असून, यामध्ये लाेकसेवा आयाेगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एक हजार ५०० उमेदवारांचाही समावेश आहे. या दीड हजारावर उमेदवारांना लाेकसेवा आयाेगाने नियुक्तीच दिली नसल्याने, गृहखात्यातील रिक्त पदांचा भार आणखीनच वाढत आहे. गुन्हेगारी माेठ्या प्रमाणात फाेफावली असतानाही, रिक्तपदांची संख्या वाढत असल्याने, तपास, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, बंदाेबस्त यांसारख्या कामांवर परिणाम हाेत असल्याची माहिती आहे.
दीड हजारावर उमेदवारांना लवकरच नियुक्ती
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने २०१८ ते २०२० या दरम्यान घेतलेल्या परीक्षेत राज्यातील तब्बल एक हजार ५०० उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गत अडीच वर्षांपासून या उमेदवारांना नियुक्तीच देण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे रिक्तपदांचा हा आकडा तब्बल दाेन हजारांच्या वर गेला आहे. असे असले, तरीही २०१८, १९ आणि २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
२०१७ मधील उमेदवारांचे प्रशिक्षण
लाेकसेवा आयाेगाने २०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३४० उमेदवारांना २०२१ मध्ये नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी बाेलावण्यात आले आहे. मे, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात हे प्रशिक्षण सुरू हाेणार असल्याची माहिती आहे. मात्र, काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरच हे प्रशिक्षण अवलंबून असल्याची माहिती आहे.
शारीरिक चाचणी बाकी
२०१८, १९ आणि २० या तीन वर्षांत घेण्यात आलेल्या पीएसआयच्या सरळसेवा परीक्षेत एक हजार ५०० उमदेवार उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, त्यांची शारीरिक चाचणी बाकी असल्याने, अद्याप नियुक्तीची प्रक्रिया करण्यात आली नाही. काेराेनाच्या संकटामुळे लाॅकडाऊन लागल्यानंतर, या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या थांबविण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे त्यांची निवड प्रक्रिया रखडलेली आहे.