शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

जामद-यात खरिपाची पेरणी नाहीच!

By admin | Updated: June 15, 2016 01:57 IST

शेतकरी ठाम असून अस्मानी, सुलतानी संकटांचा वैताग व्यक्त होत आहे.

नाना देवळे/ मंगरुळपीर (जि. वाशिम)मागील तीन वर्षांंपासून दुष्काळी परिस्थितीमुळे झालेली नापिकी तसेच वन्य प्राण्यांचा हैदोस आणि शेती समस्यांकडे होत असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष आदी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे मंगरुळपीर तालुक्यातील जामदर्‍याचे शेतकरी पार वैतागले आहेत. यामुळेच त्यांनी २२ फेब्रुवारीला खरिपाच्या पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर ते शेतकरी अद्यापही ठाम आहेत.उत्पादन खर्च आणि नफ्याचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. जगाचा पोशिंदा असला तरी स्वत:च्या कुटुंबाचेही पोट भरणे शक्य नाही. त्यामुळे तोट्याचा व्यवसाय ठरत असलेली करायची नाही म्हणून खरीप हंगामात पेरणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला जात आहे. जिल्ह्यात आता गावांमागे गावे यात सहभागी होऊ लागली आहेत. शेतीच झाली नाही, तर खायचे काय, याचा विचार सरकारने या संकटाच्या सुरुवातीलाच करायला हवा. शेतकर्‍यांजवळील कच्चा माल कवडीमोल दरात खरेदी केला जातो; पण हाच माल व्यापार्‍यांच्या गोदामात पोहोचल्यावर त्याचे दाम दुप्पट आणि तो पक्का होताच त्याची किंमत चौपट वाढते. अशा परिस्थितीत शेतकरी कसा सुखी होणार? शेतकरी आत्महत्यांचे खापर दुष्काळावर फोडून सरकार जबाबदारी झटकत आहे. सरकारचे शेतीविरोधी धोरण आणि त्यातून निर्माण झालेली विवंचना सर्वांंसमोर मांडण्यासाठीच जामदरा येथील शेतकर्‍यांनी २२ फेब्रुवारी रोजी खरीप पेरणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आणि ते अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. प्रत्यक्षात जामदराच्या शेतकर्‍यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर याची दखल घेऊन, शेतकर्‍यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते; परंतु याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील राजकीय नेते अथवा लोकप्रतिनिधींनी या शेतकर्‍यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाही. मुळात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वाशिमची ओळख आहे. त्यामुळे येथील शेतीचे प्रश्न अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकर्‍यांच्या समस्या अधिक बिकट होत चालली आहे