शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची गती मंदावली!

By admin | Updated: May 16, 2017 01:55 IST

जलयुक्तची कामे लोकसहभागातून; निधी मुरला कुठे?

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोट तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे करण्यात आली असल्याचे संबंधित यंत्रणेने राज्य पातळीवरील मूल्यमापन समितीला कळविले होते. प्रत्यक्षात मात्र दोन वर्षांत अनुक्रमे १४८.०० लाख व ५४१.३६ लाख खर्च झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्यामुळे जलयुक्तमधून विविध कामांवर खर्च झालेल्या निधीचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसहभागातून कामे झाल्याचा गवगवा करण्यात आला, तर दुसरीकडे कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शासकीय निधीतून खर्च केलेल्या कोणत्याही कामात पाणी साठलेच नाही. त्यामुळे हा निधी मुरला कुठे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकोट तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात विविध गावांची निवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्वच कामे लोकसहभागातून झाल्याचे दर्शविण्यात आले. लोकसहभागातून कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे अहवाल खुद्द अधिकाऱ्यांनी राज्य स्तर मूल्यमापन समितीसमोर सादर केले. त्यानंतर मात्र यावर्षी सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती घेतली असता, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली. त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली व १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. केवळ ११३ कामांवर १४८.०० लाख खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय, सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यांपैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती. विशेष म्हणजे, जलसंधारण व संवर्धनासाठी झपाटलेल्या गावकऱ्यांनी जल चळवळ उभी करीत मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे केली होती. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाचेल, अशी अपेक्षा होती. सर्व कामे ही लोकसहभागातूनच झाली असल्याचा गवगवा केला असताना शासनाच्या दप्तरी मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची आकडेमोड समोर आली आहे. त्यामुळे कोणती कामे लोकसहभागातून झाली व कोणत्या कामांवर शासकीय निधी खर्च करण्यात आला, याचे आॅडिट होऊन जलयुक्त शिवार योजनेमधील पारदर्शकता जनतेसमोर येणे गरजेचे झाले आहे. अकोट तालुका : १९ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ करिता अकोट तालुक्यात १९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंप्री खुर्द, खासबाग, सर्फाबाद, चोरवड खु., गोखी, बेलुरा, बोर्डी, शहानूर प्र. नरनाळा, रामापूर, कुंड, बोरी, मिर्झापूर, जऊळखेड बु., पुंडा, देवर्डा, टाकळी बु.,पळसोद, दिनोडा, गरसोळी या गावांचा समावेश आहे. या गावात शिवारफेरी घेऊन पाण्याचा ताळेबंद काढत गाव आराखडे जिल्हा समितीच्या मान्यतेकरिता १३ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तसेच सविस्तर अंदाजपत्रकांना २० मेपर्यंत प्रशासकीय मंजुरीस सादर करावे व त्यानंतर कामे सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.