शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

‘जलयुक्त’ची गती मंदावली!

By admin | Updated: May 16, 2017 01:55 IST

जलयुक्तची कामे लोकसहभागातून; निधी मुरला कुठे?

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोट तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे करण्यात आली असल्याचे संबंधित यंत्रणेने राज्य पातळीवरील मूल्यमापन समितीला कळविले होते. प्रत्यक्षात मात्र दोन वर्षांत अनुक्रमे १४८.०० लाख व ५४१.३६ लाख खर्च झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्यामुळे जलयुक्तमधून विविध कामांवर खर्च झालेल्या निधीचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसहभागातून कामे झाल्याचा गवगवा करण्यात आला, तर दुसरीकडे कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शासकीय निधीतून खर्च केलेल्या कोणत्याही कामात पाणी साठलेच नाही. त्यामुळे हा निधी मुरला कुठे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकोट तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात विविध गावांची निवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्वच कामे लोकसहभागातून झाल्याचे दर्शविण्यात आले. लोकसहभागातून कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे अहवाल खुद्द अधिकाऱ्यांनी राज्य स्तर मूल्यमापन समितीसमोर सादर केले. त्यानंतर मात्र यावर्षी सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती घेतली असता, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली. त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली व १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. केवळ ११३ कामांवर १४८.०० लाख खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय, सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यांपैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती. विशेष म्हणजे, जलसंधारण व संवर्धनासाठी झपाटलेल्या गावकऱ्यांनी जल चळवळ उभी करीत मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे केली होती. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाचेल, अशी अपेक्षा होती. सर्व कामे ही लोकसहभागातूनच झाली असल्याचा गवगवा केला असताना शासनाच्या दप्तरी मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची आकडेमोड समोर आली आहे. त्यामुळे कोणती कामे लोकसहभागातून झाली व कोणत्या कामांवर शासकीय निधी खर्च करण्यात आला, याचे आॅडिट होऊन जलयुक्त शिवार योजनेमधील पारदर्शकता जनतेसमोर येणे गरजेचे झाले आहे. अकोट तालुका : १९ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ करिता अकोट तालुक्यात १९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंप्री खुर्द, खासबाग, सर्फाबाद, चोरवड खु., गोखी, बेलुरा, बोर्डी, शहानूर प्र. नरनाळा, रामापूर, कुंड, बोरी, मिर्झापूर, जऊळखेड बु., पुंडा, देवर्डा, टाकळी बु.,पळसोद, दिनोडा, गरसोळी या गावांचा समावेश आहे. या गावात शिवारफेरी घेऊन पाण्याचा ताळेबंद काढत गाव आराखडे जिल्हा समितीच्या मान्यतेकरिता १३ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तसेच सविस्तर अंदाजपत्रकांना २० मेपर्यंत प्रशासकीय मंजुरीस सादर करावे व त्यानंतर कामे सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.