शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

वॉटर कप स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिक प्रकरणाची चौकशी थातूरमातूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

खेट्री: सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये पातूर तालुक्यातील झरंडी ग्राम पंचायतला मिळालेल्या १८ लाख रुपयांच्या पारितोषिक प्रकरणाची चौकशी थातूरमातूर ...

खेट्री: सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये पातूर तालुक्यातील झरंडी ग्राम पंचायतला मिळालेल्या १८ लाख रुपयांच्या पारितोषिक प्रकरणाची चौकशी थातूरमातूर करून सदर प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये झरंडी येथील ग्रामस्थ व महिलांनी २०१८ वर्षाच्या भरउन्हात ४५ दिवस श्रमदानातून काम केले होते. या श्रमदानातून २०१८ वर्षी ग्रामपंचायतला १८ लाखाचे पारितोषिक मिळाले होते, परंतु त्याचा गैरवापर करून काही कामे कागदोपत्री दाखवून १८ लाखांची अफरातफर केल्याचा आरोप झरंडी येथील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला होता.

परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नव्हती.पातूर तालुक्यातील वसाली जंगलात सीता न्हाणी धार्मिक स्थळावर मा. पालकमंत्री रणजित पाटील यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यासह भेट दिली होती. आणि रात्री मुक्काम सुद्धा केला होता. त्या वेळी सदर १८ लाखाचा मिळालेल्या पारितोषिक रकमेचा अपहार करण्यात आल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली, परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही, असा मुद्दा मा. पालक मंत्री यांच्या समोर उपस्थित केला होता. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत त्वरित मा. पालकमंत्री रणजित पाटील यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. सदर प्रकरणाची थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.याबत गट विकास अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही,तसेच सचिव यांनी या विषयवार बोलण्यास नकार दिला.

चौकशी पूर्ण झाली; मात्र कारवाई कधी ?

मा. पालकमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशावरून १८ लाखाच्या पारितोषिक प्रकरणाची थातूरमातूर चौकशी करण्यात आली,परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सदर प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

सचिवाला राजकीय पाठबळ

झरंडी ग्रामपंचायतचे सचिव पीं. पी. चव्हाण यांना राज्यात सत्ताधारी असलेल्या जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा पाठबळ असल्याने सदर प्रकरणाची चौकशी थातूरमातूर करून प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.चौकशीला दोन ते अडीच वर्षाचा कालावधी उलटला मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.