शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव; फवारणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप ...

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु जमिनीतील ओलावा कायम असल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले आहे. गत आठवड्यात ढगाळ‌ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून आशा वाढल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहु, हरभरा पिकांना पसंती दिल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेेत्र वाढले आहे. सध्या ग्रामीण भागात हरभऱ्याचे पीक बहरलेले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरीही अळीवर नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतित वाढ झाली आहे. सध्या तालुक्यात फवारणीला वेग आला असून, कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

----------------------

१०,४५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी

गतवर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा रब्बी हंगामात १०,४५२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्यावर अळीचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

--------------------------------

तालुक्यातील प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा

बाळापूर तालुक्यात कोणत्याही प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील नेर धामणा व कारंजा रमजानपूर येथील प्रकल्प अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

------------------

खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली; मात्र सध्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली आहे.

- संतोष वानखडे, काळबाई शिवार, बाळापूर

--------------------

फोटो