शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव; फवारणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप ...

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु जमिनीतील ओलावा कायम असल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले आहे. गत आठवड्यात ढगाळ‌ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून आशा वाढल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहु, हरभरा पिकांना पसंती दिल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेेत्र वाढले आहे. सध्या ग्रामीण भागात हरभऱ्याचे पीक बहरलेले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरीही अळीवर नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतित वाढ झाली आहे. सध्या तालुक्यात फवारणीला वेग आला असून, कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

----------------------

१०,४५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी

गतवर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा रब्बी हंगामात १०,४५२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्यावर अळीचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

--------------------------------

तालुक्यातील प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा

बाळापूर तालुक्यात कोणत्याही प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील नेर धामणा व कारंजा रमजानपूर येथील प्रकल्प अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

------------------

खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली; मात्र सध्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली आहे.

- संतोष वानखडे, काळबाई शिवार, बाळापूर

--------------------

फोटो