शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची उदासीनता; थकीत पाणीपट्टीचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ...

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ८४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची २० एप्रिलपर्यंत ४२ कोटी २९ लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम थकीत असल्याने, वीज देयकांच्या थकबाकीचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८४ खेडी व ६४ खेडी या दोन सर्वात मोठ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. परंतु ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टीच्या वसुलीच्या कामाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने, २० एप्रिलपर्यंत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची ४२ कोटी २९ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी थकीत असल्याने योजनांचे वीज देयक, देखभाल दुरुस्ती व पाणी आरक्षणाच्या रकमेचा भरणा जिल्हा परिषदेला करावा लागत आहे. त्यामध्ये वीज देयकांच्या थकीत रकमेचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीज देयकांपोटी गत महिनाभरात महावितरणमार्फत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी २० लाख रुपयांचे वीज देयक अद्याप थकीत असल्याने, देयकाचा भरणा न केल्यास पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यास योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

योजनानिहाय अशी आहे पाणीपट्टी थकीत!

६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना : ३५ कोटी रुपये

८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना: ७ कोटी २९ लाख रुपये

‘बीडीओं’चा कानाडोळा;

कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत !

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देऊन व पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसूल करण्याच्या कामाला संबंधित पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु या कामाकडे संबंधित ‘बीडीओं’कडून कानाडोळा करण्यात येत असल्याने दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.