शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ग्रामपंचायतींची उदासीनता; थकीत पाणीपट्टीचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ...

अकोला : जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ८४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची २० एप्रिलपर्यंत ४२ कोटी २९ लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टीची रक्कम थकीत असल्याने, वीज देयकांच्या थकबाकीचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. त्यानुषंगाने योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८४ खेडी व ६४ खेडी या दोन सर्वात मोठ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. परंतु ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टीच्या वसुलीच्या कामाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने, २० एप्रिलपर्यंत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची ४२ कोटी २९ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी थकीत असल्याने योजनांचे वीज देयक, देखभाल दुरुस्ती व पाणी आरक्षणाच्या रकमेचा भरणा जिल्हा परिषदेला करावा लागत आहे. त्यामध्ये वीज देयकांच्या थकीत रकमेचा भरणा करणे जिल्हा परिषदेला कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीज देयकांपोटी गत महिनाभरात महावितरणमार्फत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. १ कोटी २० लाख रुपयांचे वीज देयक अद्याप थकीत असल्याने, देयकाचा भरणा न केल्यास पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यास योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

योजनानिहाय अशी आहे पाणीपट्टी थकीत!

६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना : ३५ कोटी रुपये

८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना: ७ कोटी २९ लाख रुपये

‘बीडीओं’चा कानाडोळा;

कोट्यवधींची पाणीपट्टी थकीत !

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना निर्देश देऊन व पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसूल करण्याच्या कामाला संबंधित पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु या कामाकडे संबंधित ‘बीडीओं’कडून कानाडोळा करण्यात येत असल्याने दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.