लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यानी आक्रमक होत संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपावर गेल्याने बाजारपेठांमधील फळ-भाजीपाल्यांची आवक घटली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शुक्रवारी मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला, तर जिल्हाभरात दौऱ्यावर असलेल्या पीआरसीच्या सदस्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिवापाड जपून तयार केलेला शेतमाल फेकण्याची वेळ आल्यावरही सरकारला जाग येत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने आता आणखी अंत पाहू नये, कर्जमुक्तीसोबतच हमीभाव देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मूर्तिजापुरात निषेधमूर्तिजापुरात शेतकरी संघटनेने कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. श्रीकांत तिडके, गुलाबराव म्हसाये, बाळासाहेब तायडे, पंकज वानखेडे, मनोज तायडे, शरद सरोदे, प्रदीप ठाकरे, विजय राऊत, जगदीश जोगळे, श्रीराम सोळंके आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता वाढली!
By admin | Updated: June 3, 2017 01:44 IST