शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता वाढली!

By admin | Updated: June 3, 2017 01:44 IST

भाजीपाल्याचे भाव वाढले : मूर्तिजापुरात कांदा रस्त्यावर फेकला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यानी आक्रमक होत संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकरी संपावर गेल्याने बाजारपेठांमधील फळ-भाजीपाल्यांची आवक घटली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शुक्रवारी मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकला, तर जिल्हाभरात दौऱ्यावर असलेल्या पीआरसीच्या सदस्यांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जिवापाड जपून तयार केलेला शेतमाल फेकण्याची वेळ आल्यावरही सरकारला जाग येत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने आता आणखी अंत पाहू नये, कर्जमुक्तीसोबतच हमीभाव देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मूर्तिजापुरात निषेधमूर्तिजापुरात शेतकरी संघटनेने कांदा रस्त्यावर फेकून निषेध केला. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. श्रीकांत तिडके, गुलाबराव म्हसाये, बाळासाहेब तायडे, पंकज वानखेडे, मनोज तायडे, शरद सरोदे, प्रदीप ठाकरे, विजय राऊत, जगदीश जोगळे, श्रीराम सोळंके आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.